शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

स्थायी समितीच्या सभापती निवडणुकीसाठी घोडेबाजार तेजीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:27 IST

उल्हासनगर पालिका: समिती सदस्य अज्ञातस्थळी झाले रवाना

उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच समितीचे सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले असून, त्यांचे मोबाइलही नॉटरिचेबल झाले. दरम्यान, समिती सदस्य असलेले भाजप समर्थक व साई पक्षाचे गजानन शेळके शिवसेनेच्या गळ्याला लागल्याने भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन घोडेबाजार तेजीत असल्याची टीका होत आहे.उल्हासनगर महापालिका स्थायी समिती सभापतिपदाची निवडणूक एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहे. स्थायी समितीमधील एकूण १६ पैकी भाजपचे आठ, भाजप समर्थक साई पक्षाचा एक, शिवसेना पाच, रिपाइं एक व राष्ट्रवादी एक असे पक्षीय बलाबल आहे. साई पक्षाच्या समर्थक सदस्यांमुळे भाजपचे समितीमध्ये स्पष्ट बहुमत आहे. दरम्यान साई पक्षाचे समिती सदस्य शेळके गेल्या महिन्यापासून नॉटरिचेबल झाले असून, ते शिवसेना आघाडीच्या गळ्याशी लागल्याचे बोलले जात आहे. शेळके यांच्यामुळे भाजप व शिवसेना आघाडीची संख्या समसमान होऊन समिती सभापतिपदासाठी समिती सदस्य फोडाफोडीला सुरुवात झाली.शेळके यांच्या शिवसेना जवळीकतेमुळे भाजपला धक्का बसला आहे. पक्षाचे सलग दुसऱ्यांदा सभापतिपदाचे स्वप्न भंगणार असल्याचे बोलले जात आहे. उपमहापौर भगवान भालेराव हे सभापतिपदासाठी शिवसेना आघाडीकडून इच्छुक आहेत. मात्र शिवसेनेतील एका गटाचा त्यांना विरोध असल्याने, दुसऱ्या एखाद्या सदस्याचे नाव पुढे येण्याची शक्यता एका स्थानिक शिवसेना नेत्याने नाव प्रसिद्ध ना करण्याच्या अटीवर दिली.भाजपचे स्थायी समितीच्या सदस्यात फोडाफोडी टाळण्यासाठी पक्षाचे एकूण आठ सदस्य अज्ञातस्थळी गेले आहे, तर शिवसेनेचे पाच, रिपाइं एक, राष्ट्रवादी एक व शेळके असे आठ समिती सदस्य ठाणे जिल्ह्याच्या एक नेत्याच्या नजरेखाली एका हॉटेलमध्ये नजरकैदेत असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना आघाडीकडून वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्या समिती सदस्यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणार असल्याची माहिती  शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली, तर यावेळी भाजप  शिवसेनेला धक्का देणार असल्याची माहिती भाजपने दिली आहे.भालेराव यांच्या भूमिकेकडे लक्ष?उपमहापौर भगवान भालेराव हे स्वतः समिती सभापतिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांच्या भूमिकेकडे शिवसेना आघाडी व भाजपचे लक्ष लागले आहे. सभापतिपदासाठी भालेराव यांनी शिवसेनेकडे साकडे घातले. शिवसेनेने त्यांना सभापतिपदासाठी उमेदवारी दिली नाही तर ते भाजपमध्ये जाण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.