शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:00 IST

पालिका निवडणूक : इच्छुकांकडे केली जातेय लाखोंची मागणी

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : निवडणुकीची आरक्षण सोडत ही १८ फेब्रुवारीला पालिका कार्यालयात होणार आहे. मात्र, त्याआधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गणिते तयार करून त्या अनुषंगाने काही नेतेच घोडेबाजार करत आहेत. आरक्षण पडणार नसले तरी त्या प्रभागावर आरक्षण पडणार, असे भासवत आरक्षण बदलून देतो, असे सांगून १० ते १५ लाखांची मागणी केली जात आहे. तर, काही राजकीय नेते निवडणूक आयोगाकडे आपली खूप ओळख असल्याचे दाखवत इच्छुकांकडे पैशांची मागणी करत आहेत.अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचे आरक्षण हे प्रभागातील लोकसंख्येच्या गणितावर अवलंबून आहे. ज्या प्रभागात एससी, एसटी यांची लोकसंख्या जास्त आहे, त्या प्रभागात आरक्षणही चक्राकार पद्धतीने पाडण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून आरक्षण बदलण्याचे काम सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही नेते या आरक्षणाच्या गणितावर पैशांचा बाजार मांडत आहे.कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण पडणार, याचा आकडेवारीनुसार अंदाज काढणे सोपे झाले आहे. गुरुवारी दुपारी एसीसी आणि एसटीची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली. त्यातच जनगणनेतील ब्लॉक आणि त्याची लोकसंख्याही वर्ग केलेली आहे. त्या ब्लॉकनुसार आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.मुळात अनेक इच्छुक उमेदवारांना आकडेवारीची गणितेच माहीत नसल्याने तेही भीतीपोटी या आमिषाला बळी पडत आहेत. आपली पाच वर्षांची मेहनत वाया जाण्यापेक्षा काही जुगाड होतो का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक हे पैसे खाऊ राजकारण्यांचे बळी पडले आहेत. काही कंत्राटदारही त्याच नीतीचा अवलंब करून पैसे उकळण्याचे काम करत आहेत.याआधी निवडणूक आयोग जे आरक्षण देणार ते मान्य करून पुढे चालत होते. मात्र, दोन दिवसांत आरक्षणबदलाची आणि आरक्षणाचे ‘सेटिंग’ होते का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार चिंतेत आहे.आरक्षणाची हेराफेरी झाल्यास काही अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मांडलेल्या बाजाराचे सर्व खापर आता अधिकाºयांवर फोडले जाण्याची शक्यता आहे.बदलापूरमध्ये अद्याप शांतताबदलापूर : आरक्षणात बदल करण्यासंदर्भातील चर्चा ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये सुरू आहे, तशी कोणतीही चर्चा बदलापूरमध्ये अद्याप तरी रंगात आलेली नाही. बदलापुरातील राजकीय नेत्यांनी मानसिकता तयार ठेवल्याने जे आरक्षण पडेल, ते मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पैशांच्या जोरावर आरक्षण बदलण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत नाही.च्दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला काढली जाणार होती. मात्र ही सोडत पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने तोंडी आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र ही पुढे ढकलण्यात आलेली तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोगाचे सातत्याने बदलणारे आदेश हे संभ्रम निर्माण करणारे ठरत आहेत. तर दुसरीकडे वेळापत्रक आणि आदेश सातत्याने बदलत गेल्याने आयोगावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.