शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

आरक्षणबदलासाठी अंबरनाथमध्ये घोडेबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 00:00 IST

पालिका निवडणूक : इच्छुकांकडे केली जातेय लाखोंची मागणी

पंकज पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कअंबरनाथ : निवडणुकीची आरक्षण सोडत ही १८ फेब्रुवारीला पालिका कार्यालयात होणार आहे. मात्र, त्याआधी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची गणिते तयार करून त्या अनुषंगाने काही नेतेच घोडेबाजार करत आहेत. आरक्षण पडणार नसले तरी त्या प्रभागावर आरक्षण पडणार, असे भासवत आरक्षण बदलून देतो, असे सांगून १० ते १५ लाखांची मागणी केली जात आहे. तर, काही राजकीय नेते निवडणूक आयोगाकडे आपली खूप ओळख असल्याचे दाखवत इच्छुकांकडे पैशांची मागणी करत आहेत.अंबरनाथ नगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती (एससी) आणि अनुसूचित जमाती (एसटी) यांचे आरक्षण हे प्रभागातील लोकसंख्येच्या गणितावर अवलंबून आहे. ज्या प्रभागात एससी, एसटी यांची लोकसंख्या जास्त आहे, त्या प्रभागात आरक्षणही चक्राकार पद्धतीने पाडण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून आरक्षण बदलण्याचे काम सुरू असल्याची चर्चा रंगली आहे. त्यातच काही नेते या आरक्षणाच्या गणितावर पैशांचा बाजार मांडत आहे.कोणत्या प्रभागावर कोणते आरक्षण पडणार, याचा आकडेवारीनुसार अंदाज काढणे सोपे झाले आहे. गुरुवारी दुपारी एसीसी आणि एसटीची आकडेवारी निवडणूक आयोगाकडे आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिली. त्यातच जनगणनेतील ब्लॉक आणि त्याची लोकसंख्याही वर्ग केलेली आहे. त्या ब्लॉकनुसार आरक्षण बदलून देतो, असे सांगून पैशांची मागणी केली जात आहे.मुळात अनेक इच्छुक उमेदवारांना आकडेवारीची गणितेच माहीत नसल्याने तेही भीतीपोटी या आमिषाला बळी पडत आहेत. आपली पाच वर्षांची मेहनत वाया जाण्यापेक्षा काही जुगाड होतो का, याचीही चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक हे पैसे खाऊ राजकारण्यांचे बळी पडले आहेत. काही कंत्राटदारही त्याच नीतीचा अवलंब करून पैसे उकळण्याचे काम करत आहेत.याआधी निवडणूक आयोग जे आरक्षण देणार ते मान्य करून पुढे चालत होते. मात्र, दोन दिवसांत आरक्षणबदलाची आणि आरक्षणाचे ‘सेटिंग’ होते का याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवार चिंतेत आहे.आरक्षणाची हेराफेरी झाल्यास काही अधिकाऱ्यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मांडलेल्या बाजाराचे सर्व खापर आता अधिकाºयांवर फोडले जाण्याची शक्यता आहे.बदलापूरमध्ये अद्याप शांतताबदलापूर : आरक्षणात बदल करण्यासंदर्भातील चर्चा ज्या पद्धतीने अंबरनाथमध्ये सुरू आहे, तशी कोणतीही चर्चा बदलापूरमध्ये अद्याप तरी रंगात आलेली नाही. बदलापुरातील राजकीय नेत्यांनी मानसिकता तयार ठेवल्याने जे आरक्षण पडेल, ते मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. पैशांच्या जोरावर आरक्षण बदलण्याचा प्रयत्न येथे होताना दिसत नाही.च्दोन्ही नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला काढली जाणार होती. मात्र ही सोडत पुन्हा पुढे ढकलली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणूक आयोगाने तोंडी आदेश पालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र ही पुढे ढकलण्यात आलेली तारीख अद्याप स्पष्ट केलेली नाही. निवडणूक आयोगाचे सातत्याने बदलणारे आदेश हे संभ्रम निर्माण करणारे ठरत आहेत. तर दुसरीकडे वेळापत्रक आणि आदेश सातत्याने बदलत गेल्याने आयोगावर राजकीय दबाव वाढल्याची चर्चा शहरात रंगली आहे.