शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

सरकारी योजनांसाठी निराधार महिलांना गाठावे लागते ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार ...

मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू असल्याने या योजनेच्या सुविधाही येथेच उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वार्षिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटस्फोटित, विधवा यांना महिना ६०० रुपये मदत केली जाते. या योजनेचे कार्यालय ठाणे तहसीलदार यांच्या अंतर्गत असल्याने मीरा-भाईंदरमधील गरजू महिलांना या योजनेसाठी ठाण्याला जावे लागते. मीरा- भाईंदरमधून ठाण्याला जाणे म्हणजे खर्चिक तर आहेच, शिवाय वाहतूककोंडी पाहता गरजू महिलांना ठाण्याला खेपा मारणे परवडत नाही. दिवस वाया जातोच शिवाय त्रासाला सामोरे जावे लागते. एका खेपेत कामही होत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या महिलांना ठाण्याच्या खेपा मारणे जिकिरीचे झाले आहे.

मीरा-भाईंदरची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता भाईंदरच्या मॅक्सस मॉलमागील पालिका इमारतीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाले आहे. परंतु, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना या ठाणे तहसीलदार यांच्या कार्यालयातूनच राबवल्या जातात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना येथील अपर तहसीलदार कार्यालयात सुरू करावी, अशी मागणी होत आहे. जेणेकरून, महिलांना ठाण्याच्या खेपा माराव्या लागणार नाहीत आणि पैसे व वेळ वाया जाणार नाही.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

मीरा रोड प्रभाग समिती सभापती हेतल परमार यांनी नुकतेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह तहसीलदार ठाणे, अपर तहसीलदार मीरा-भाईंदर, महापौर आणि आयुक्तांना निवेदन देऊन भाईंदर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती करावी. त्याचसोबत महिलांची अडचण पाहता तातडीने या योजनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे परमार यांनी म्हटले आहे.