शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सरकारी योजनांसाठी निराधार महिलांना गाठावे लागते ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:42 IST

मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार ...

मीरा रोड : सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या लाभासाठी मीरा-भाईंदरमधील निराधार आणि विधवांना ठाणे येथील तहसीलदार कार्यालयात खेपा माराव्या लागतात. मीरा-भाईंदरसाठी स्वतंत्र अपर तहसीलदार कार्यालय सुरू असल्याने या योजनेच्या सुविधाही येथेच उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेंतर्गत वार्षिक २१ हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या घटस्फोटित, विधवा यांना महिना ६०० रुपये मदत केली जाते. या योजनेचे कार्यालय ठाणे तहसीलदार यांच्या अंतर्गत असल्याने मीरा-भाईंदरमधील गरजू महिलांना या योजनेसाठी ठाण्याला जावे लागते. मीरा- भाईंदरमधून ठाण्याला जाणे म्हणजे खर्चिक तर आहेच, शिवाय वाहतूककोंडी पाहता गरजू महिलांना ठाण्याला खेपा मारणे परवडत नाही. दिवस वाया जातोच शिवाय त्रासाला सामोरे जावे लागते. एका खेपेत कामही होत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या या महिलांना ठाण्याच्या खेपा मारणे जिकिरीचे झाले आहे.

मीरा-भाईंदरची झपाट्याने वाढती लोकसंख्या पाहता भाईंदरच्या मॅक्सस मॉलमागील पालिका इमारतीत अपर तहसीलदार कार्यालय सुरू झाले आहे. परंतु, संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध योजना या ठाणे तहसीलदार यांच्या कार्यालयातूनच राबवल्या जातात. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना येथील अपर तहसीलदार कार्यालयात सुरू करावी, अशी मागणी होत आहे. जेणेकरून, महिलांना ठाण्याच्या खेपा माराव्या लागणार नाहीत आणि पैसे व वेळ वाया जाणार नाही.

कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी

मीरा रोड प्रभाग समिती सभापती हेतल परमार यांनी नुकतेच जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह तहसीलदार ठाणे, अपर तहसीलदार मीरा-भाईंदर, महापौर आणि आयुक्तांना निवेदन देऊन भाईंदर येथील तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजनेचे कार्यालय सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती करावी. त्याचसोबत महिलांची अडचण पाहता तातडीने या योजनेची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे परमार यांनी म्हटले आहे.