शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

होम क्वॉरण्टाइन, व्याधिग्रस्तांवर महापालिका ठेवणार लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:40 IST

ठाणे : व्याधिग्रस्त आणि घरीच उपचार घेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वर्षभरात वाढले आहे. रुग्णालयात उशिरा दाखल झालेल्या ...

ठाणे : व्याधिग्रस्त आणि घरीच उपचार घेणाऱ्या काेराेना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वर्षभरात वाढले आहे. रुग्णालयात उशिरा दाखल झालेल्या ६०० रुग्णांचा मृत्यू झाल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. यापुढे असे मृत्यू रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने ठोस पावले उचलली आहेत. त्याअनुषंगाने होम आयसोलेशनमध्ये असलेल्या व्याधिग्रस्त, पोस्ट कोविड व हायरिस्क रुग्णांच्या प्रकृतीबाबत काॅल सेंटरच्या माध्यमातून चाैकशी करून दरराेज नाेंदी ठेवल्या जाणार आहेत. चार विशेष डॉक्टरांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव १९ मे रोजीच्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे.

ठाण्याचा मृत्युदर हा इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. रुग्ण चार पटीने वाढत असताना मृत्युदर स्थिर असल्याचे दिसून आले आहे. व्याधिग्रस्त आणि कोरोनाबाधित रुग्ण उशिराने रुग्णालयात दाखल होत असल्याने मृत्यू वाढल्याचे दिसत आहे. असे मृत्यू रोखण्यासाठी महापालिकेने तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार केली आहे. या डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीला असलेल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने अशा प्रकारच्या रुग्णांची दररोज विचारपूस केली जाणार आहे. त्यांना कोणत्या स्वरूपाचा त्रास आहे. ताप, ऑक्सिजन लेव्हल, वास घेण्याची क्षमता कशी आहे, याबाबत नाेंद करून त्यांना योग्य औषधोपचार दिले जाणार आहेत. व्याधिग्रस्त नागरिकांची नियमित माहिती घेतल्यास त्यांना कोविड होण्याचा व त्यांच्यामुळे इतर लोकांना प्रादुर्भाव होण्याचा धोका टाळणे शक्य होणार आहे. तसेच त्यांचे मानसिक संतुलन योग्य ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोस्ट कोविड रुग्णांनाही दैनंदिन फोन करून त्यांच्या प्रकृतीची नोंद घेण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या नाेंदी ठेवण्यासाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून सुसज्ज कॉल सेंटर तयार करण्यात येणार आहे. या कॉल सेंटरच्या माध्यमातून प्रकृती खालावलेल्या रुग्णांचा डाॅक्टरांसाेबत तत्काळ संवाद करून देण्यात येईल.

या डाॅक्टरांची हाेणार नियुक्ती

डॉ. स्वाती शिंदे, डाॅ. मनीषा म्हस्के, डाॅ. नेहा कोल्हे आणि डाॅ. तानाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या वैद्यकीय अधिकाऱ्यांची मासिक वेतन ६० हजार याप्रमाणे तीन महिन्यांसाठी करारपद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी सात लाख २० हजारांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.