शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
5
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
6
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
7
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
8
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
9
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
10
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
11
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
12
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
13
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
14
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
15
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
16
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
17
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
18
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
19
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
20
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
Daily Top 2Weekly Top 5

घर, सोसायटीच्या आवारात रुग्णांकडील कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 00:01 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती । ठाणे महापालिका प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कोरोना रुग्णांच्या घरातील कचरा दररोज संकलित करण्यात महापालिकेने दुर्लक्ष केल्याने त्याघरासह सोसायटीच्या आवारात कचºयाच्या पिशव्यांचे ढीग लागले आहेत. आठ-आठ दिवस महापालिकेची गाडी तो घेण्यासाठी फिरकत नसून अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्यामुळे संपूर्ण सोसायटीत कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळलेले घर महापालिका सील केले करते किंवा रुग्णास होम क्वॉरंटाइन करते. त्यानंतर रुग्णाने वापरलेले मास्क, ग्लोज हे वैद्यकिय साहित्यासह ओला व सुका कचरा सरसकट फेकून न देता वेगळा ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. हा कचरा दररोज संकलित करून त्याची स्वतंत्रपणे विल्हेवाट लावण्याचे सांगितले आहे. मात्र, घोडबंदर रोडबरोबरच ठाणे शहरातील काही सोसायट्यांमध्ये आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांचा कचरा घरातच पडून आहे. काही ठिकाणी सोसायट्यांच्या आवारात त्याच्या पिशव्यांचे ढीग ठेवल्या आहेत. यामुळे संपूर्ण सोसायटी कोरोनाग्रस्त होण्याची भीती आहे, याकडे या प्रकाराबद्दल भाजपचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी महापालिका आयुक्त विजय सिंघल यांचे लक्ष वेधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनाही पत्र पाठवून दखल घेण्याची मागणी केली आहे.

रुग्णाच्या घरातील कचरा दररोज उचलण्यासाठी मनपा अधिकाºयांकडे संपर्क साधल्यानंतर, आज ड्रायव्हर नाही, तर उद्या गाडी पाठवितो, अशी कारणे सांगून टाळाटाळ केली जाते. शहरात कोरोना नियंत्रणात येत नसताना अशा बेफिकरीमुळे आणखी फैलाव होण्याची भीती व्यक्त आहे.‘खाजगीदुकानदारी' सुरू : कोरोना रुग्णांचा कचरा उचलण्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत असल्याने खाजगी दुकानदारी सुरू झाली आहे. काही सोसायट्यांमध्ये रुग्ण तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांकडूनच तो उचलण्यासाठी खाजगी व्यक्तींचे क्रमांक दिले जात असल्याचा प्रकार घडला आहे.या व्यक्तींकडून कचरा उचलण्यासाठी पैसे आकारले जाणार असल्याचे सोसायटीच्या पदाधिकाºयांना स्पष्ट केले जाते, असा आरोप मनोहर डुंबरे यांनी केला. खाजगी चाचणी, खाजगी रुग्णालय आणि आता कचरा उचलण्यासाठीही खाजगी व्यक्तींना पैसे मोजायचे, तर राज्य सरकार किंवा महापालिकेने केवळ निधी जमवायचा का, असा संतप्त सवाल त्यांनीकेला आहे.