शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

उघड्यावर प्रातर्विधी करणाऱ्यांची धरपकड

By admin | Updated: February 15, 2017 04:37 IST

अंबरनाथ नगरपालिकेने शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला वेग देत आता थेट उघड्यावर

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिकेने शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला वेग देत आता थेट उघड्यावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांना थेट पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे काम पालिकेच्या पथकाने सुरु केले आहे. पहिल्याच दिवशी २२ नागरिकांना उघड्यावर प्रातर्विधीस बसले म्हणून पालिकेच्या भरारी पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही मोहीम दररोज केली जाणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेने वर्षभरापासून शहर हागणदारी मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अनुषंगाने शहरात अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृही उभारले आहे. तसेच अनेक स्वच्छतागृहांची दुरुस्तीही केली आहे. घरगुती स्वच्छतागृह उभारण्याची मोहीमही हाती घेतली होती. अनेक नागरिकांनी घरात आणि घराबाहेर वैयक्तिक स्वच्छतागृहे उभारली आहेत.स्वच्छतागृहाचे बांधकाम झाल्यावर पालिकेने आता उघड्यावर प्रातर्विधीस बसणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत केल आहे. महिन्याभरापासून पालिकेने उघड्यावर जाणाऱ्यांना बंदी घालत त्यांना स्वच्छतागृहाचा वापर करण्यास भाग पाडत होते. महिनाभर ही कारवाई केल्यावर जे नागरिक उघड्यावर बसतात त्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी कायदेशीर बाब पुढे केली आहे. मंगळवारी सकाळी पालिकेच्या भरारी पथकाने बुवापाडा आणि परिसरात उघड्यावर जाणाऱ्यांवर कडक कारवाई करत अनेकांना ताब्यात घेतले. टमरेल घेऊन उघड्यावर जाणाऱ्यांना या पथकाने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतले. २२ नागरिकांवर ही कारवाई केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयात नागरिकांनी आपली चूक कबूल केली. पुन्हा उघड्यावर बसणार नाही याची हमी दिली. अखेर न्यायालयाने या सर्वांवर दंडात्मक कारवाई करुन सोडून दिले. पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या कामासाठी बोलवत आहेत. रोजचे कामकाज सांभाळून या कर्मचाऱ्यांना याचे काम करावे लागत आहे. रोज सकाळी निश्चित केलेल्या ठिकाणी प्रत्येक कर्मचाऱ्याला जाऊन तेथील परिस्थिती सुधारण्याची जबाबदारी दिली आहे. शहरात बुवापाडा, मोरिवली पाडा, जावसई, फुलेनगर येथे सर्वाधिक नागरिक उघड्यावर प्रातर्विधीस जात होते. त्यामुळे या परिसरावर सर्वाधिक लक्ष देण्यात आले. (प्रतिनिधी)