शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ जलश्रीमंत!

By admin | Updated: April 11, 2016 01:26 IST

पाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेपाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे. २००५पासून या सोसायटीने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असतानाही या सोसायटीत २४ तास पाणी मिळत आहे. यातही सजग नागरिक म्हणून ही सोसायटी या पाण्याचा मर्यादित वापर करीत आहे. बोअरवेल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी शुद्धीकरण, एसीमधून पडणाऱ्या पाण्याची बचत यांसारखे अभिनव उपक्रम राबविणारी ही सोसायटी ठाण्यातील इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाईची दूरदृष्टी ठेवून या सोसायटीने पाणी बचतीचे विविध प्रकल्प राबविले आणि आजच्या भीषण टंचाईत या प्रकल्पांचा फायदा या सोसायटीला होत आहे. घोडबंदर रोड येथे असलेल्या या सोसायटीत २००३ साली ज्यावेळी रहिवाशी राहण्यास आले तेव्हा सुरुवातीला त्यांना पाण्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. तब्बल २०० सदनिकांच्या सोसायटीला ठाणे महानगरपालिकेकडून पाणी मिळत होते; परंतु ते मुबलक नव्हते. त्यामुळे सोसायटीने टँकरचे पाणी मागविण्यास सुरुवात केली. तेही पाणी दूषित असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तब्बेत बिघडण्यास सुरुवात झाली. यावर पहिला तोडगा म्हणून सोसायटीने २००५ साली बोअरवेल हा प्रकल्प राबविला. त्यानंतर २००७ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत चार बोअरवेल तयार केले; परंतु या बोअरवेलमधील पाणी पिण्यालायक नसल्याने ते शुद्ध करून प्यावे लागत होते. त्यामुळे रहिवाशांनी विकत पाणी आणण्यास सुरुवात केली. ते फार खर्चीक होऊ लागले. यावरही सोसायटीने अभिनव तोडगा काढला. सोसायटीमध्येच २००९ साली जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला. दर महिन्याला या प्लाण्टमधील पाणी पिण्यालायक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत त्या पाण्याचा नमुना पाठविला जातो आणि प्रयोगशाळेतून उत्तम पिण्यालायक पाणी असल्याचे प्रमाणपत्रही मिळत असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील हडकर यांनी सांगितले. पाण्याची समस्या लक्षात घेता रोज गाड्या धुण्याचे प्रमाणही कमी केले.