शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

ठाण्यातील ‘हिलग्रेंज’ जलश्रीमंत!

By admin | Updated: April 11, 2016 01:26 IST

पाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे.

प्रज्ञा म्हात्रे,  ठाणेपाण्याच्या थेंबाथेंबासाठी सर्वत्र संघर्ष सुरू असतानाच ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेटमधील ‘हिलग्रेंज’ सोसायटीत मात्र जलश्रीमंत आहे. २००५पासून या सोसायटीने राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई असतानाही या सोसायटीत २४ तास पाणी मिळत आहे. यातही सजग नागरिक म्हणून ही सोसायटी या पाण्याचा मर्यादित वापर करीत आहे. बोअरवेल, रेनवॉटर हार्वेस्टिंग, पाणी शुद्धीकरण, एसीमधून पडणाऱ्या पाण्याची बचत यांसारखे अभिनव उपक्रम राबविणारी ही सोसायटी ठाण्यातील इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरली आहे. भविष्यात होणारी पाणीटंचाईची दूरदृष्टी ठेवून या सोसायटीने पाणी बचतीचे विविध प्रकल्प राबविले आणि आजच्या भीषण टंचाईत या प्रकल्पांचा फायदा या सोसायटीला होत आहे. घोडबंदर रोड येथे असलेल्या या सोसायटीत २००३ साली ज्यावेळी रहिवाशी राहण्यास आले तेव्हा सुरुवातीला त्यांना पाण्याचा प्रचंड त्रास जाणवू लागला. तब्बल २०० सदनिकांच्या सोसायटीला ठाणे महानगरपालिकेकडून पाणी मिळत होते; परंतु ते मुबलक नव्हते. त्यामुळे सोसायटीने टँकरचे पाणी मागविण्यास सुरुवात केली. तेही पाणी दूषित असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांची तब्बेत बिघडण्यास सुरुवात झाली. यावर पहिला तोडगा म्हणून सोसायटीने २००५ साली बोअरवेल हा प्रकल्प राबविला. त्यानंतर २००७ ते २००९ या तीन वर्षांच्या कालावधीत चार बोअरवेल तयार केले; परंतु या बोअरवेलमधील पाणी पिण्यालायक नसल्याने ते शुद्ध करून प्यावे लागत होते. त्यामुळे रहिवाशांनी विकत पाणी आणण्यास सुरुवात केली. ते फार खर्चीक होऊ लागले. यावरही सोसायटीने अभिनव तोडगा काढला. सोसायटीमध्येच २००९ साली जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला. दर महिन्याला या प्लाण्टमधील पाणी पिण्यालायक आहे की नाही हे तपासण्यासाठी सरकारमान्य प्रयोगशाळेत त्या पाण्याचा नमुना पाठविला जातो आणि प्रयोगशाळेतून उत्तम पिण्यालायक पाणी असल्याचे प्रमाणपत्रही मिळत असल्याचे सोसायटीचे उपाध्यक्ष सुनील हडकर यांनी सांगितले. पाण्याची समस्या लक्षात घेता रोज गाड्या धुण्याचे प्रमाणही कमी केले.