शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 23:40 IST

भाजपचे पोलिसांना निवेदन : कडक कारवाई करण्याची मागणी, उल्हासनगरमध्ये गुन्हेगारी वाढली

उल्हासनगर : शहरातील पालिकेच्या शाळेसमोर उभे राहून मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमिओंविरोधात कारवाई करण्याचे निवेदन भाजप शिष्टमंडळाने उल्हासनगर पोलिसांना मंगळवारी दिले. यापूर्वी शहरातील गुन्हेगारीबाबतही पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिल्याची माहिती राजेश वधारिया यांनी दिली.

उल्हासनगरात गुन्हेगारी वाढली असून, याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी पोलीस उपायुक्त प्रमोदकुमार शेवाळे यांना निवेदनाद्वारे केली. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना साकडे घालून गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. गुन्हेगारी व अमली पदार्थ तस्करांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. आता नागरिकांसमोर वेगळाच प्रश्न उभा ठाकला आहे. पालिकेच्या शाळा प्रवेशद्वारासमोर रोडरोमिओंचा अड्डा असून मुलींना छेडण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे. मुलींच्या पालकांनी विरोध केल्यास त्यांना मारहाण करण्याचेही प्रकार घडल्याचा आरोप भाजप नेते आणि स्थायी समिती सभापती राजेश वधारिया यांनी करत याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी त्यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम यांच्याकडे केली. गेल्या आठवड्यात रिक्षाने जाणाºया कॉलेज तरुणीची छेडछाड केल्याचा प्रकार घडला होता. याशिवाय, आरकेटी कॉलेजच्या एका मुलीला सपना गार्डनसारख्या वर्दळीच्या ठिकाणी रस्त्यात अडवून तिची छेड काढली होती. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही कारवाई न झाल्याने मुलींच्या वडिलांनी हा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला असता, शिवसेनेने मुलीला संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. कॉलेज, शाळा परिसर तसेच उल्हासनगर, शहाड व विठ्ठलवाडी रेल्वेस्टेशन परिसरात हे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्याची मागणी सर्वस्तरातूंन होत आहे. चायनीज खाद्यपदार्थविक्रेते गावठी दारू पिण्यास सर्रास परवानगी दिली जात असल्याचा आरोपही वधारिया यांनी निवेदनात केला.पोलीस बंदोबस्ताची मागणीशाळा व महाविद्यालयांसमोर रोडरोमिओंची दादागिरी आणि मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढत आहेत. याला आळा घालण्यासाठी शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारांवर शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेला पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी सर्वस्तरांतून होत आहे. रोडरोमिओंचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक व्यक्त करीत आहेत.