शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

कनिष्ठ बालगृहातील मुलांना नरकयातना

By admin | Updated: July 27, 2015 23:27 IST

शहरातील शासकीय कनिष्ठ बालगृह वसतिगृहातील मुलांच्या वाट्याला नरकयातना आल्या असून सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे.

उल्हासनगर : शहरातील शासकीय कनिष्ठ बालगृह वसतिगृहातील मुलांच्या वाट्याला नरकयातना आल्या असून सौरऊर्जा यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्याने अंघोळ करावी लागत आहे. तसेच पिण्याचे अ‍ॅक्वागार्ड मशीन, टेलिफोन बंद असून संरक्षण भिंती पडल्याने मैदान जुगाराचा व गर्दुल्ल्यांचा अड्डा बनला आहे. उल्हासनगरात जिल्ह्यातील सर्वाधिक शासकीय कनिष्ठ व वरिष्ठ बालगृहांसह इतर वसतिगृहे असून त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. कॅम्प नं-४, सुभाष टेकडी परिसरात कनिष्ठ बालगृह असून बालगृहात ४० मुले निवासी शिक्षण घेत आहेत. वसतिगृहाची व मैदानाची संरक्षण भिंत झोपडपट्टीधारकांनी तोडून मधोमध रस्ता केला आहे. परिसरातील जुगारी व गर्दुल्ल्यांनी मैदानाचा ताबा घेतला असून त्याचा परिणाम मुलांवर होत आहे. बालगृहातील मुलांच्या गाद्या व चादरींना दुर्गंधी सुटली असून गाद्यांवर झोपल्याने मुले आजारी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याचे अ‍ॅक्वागार्ड वर्षानुवर्षे बंद पडल्याने थेट नळावाटे आलेल्या पाण्याचा वापर पिण्यासाठी व अंघोळीसाठी करीत आहेत. बालगृहातील मुलांना पावसाळा व हिवाळ्यात गरम पाणी अंघोळीसाठी मिळावे, यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून मैदानात सौरऊर्जा यंत्रणा उभी केली आहे. मात्र, यंत्रणा बंद पडल्याने मुलांना थंड पाण्यानेच अंघोळ करावी लागत आहे. बालगृहातून मुले पळून जाण्याच्या घटना घडत असून बांधकाम विभागाकडे संरक्षण भिंत बांधण्याची मागणी केली आहे. (प्रतिनिधी)अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेचा अभावशासनाच्या अनियमित निधीअभावी टेलिफोन बंद पडला असून संपर्क साधण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याचे उघड झाले आहे. आई किंवा वडील नसणारे, निराधार, गरीब व भीक मागणाऱ्या मुलांना बालगृहात ठेवले जाते. बालगृहातील अपुरा कर्मचारीवर्ग, सुखसुविधेच्या अभावामुळे मुलांची संख्या दिवसेंदिवस रोडावत चालली आहे. संरक्षण भिंत तोडल्याने मैदानाच्या मधोमध रस्ता झाला असून कोणीही आत-बाहेर जाऊ शकतो. तसेच दिवसा किक्रेट खेळणारी मुले तर रात्री गर्दुल्ले व जुगाऱ्यांनी मैदानाचा ताबा घेतला आहे.