शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पावसामुळे वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

दमदार पावसामुळे वालधुनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे वालधुनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत १०० पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. कोळेगाव परिसरातील घरांत पाणी शिरले. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांना फूड पाकिटे वाटल्याची माहिती प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे. कासा रिओ येथील नाला दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर नांदिवली परिसरात पाणी शिरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील मोहम्मद अली चौक ते एसीपी कार्यालयापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाजी चौकातही पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कल्याण-मुरबाड रोडवरील वरप, कांबा, म्हारळ यादरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. कल्याण-शीळ रस्त्यावरही पाणी साचले होते. या भागातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कल्याण उल्हासनगर मार्गावरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण अतिवृष्टीचे आहे. रविवारी रात्रीपासून नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याच्या काही घटना सखल भागात घडल्या आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना इतरत्र हलविले जात आहे. त्यांना फूड पाकिटे पुरविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता भरतीची वेळ आहे. पाऊस थांबला नाही तर भरतीच्या वेळी महापालिका प्रशासन सखल भागात जास्त लक्ष ठेवणार आहे.

--------------------------------