शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:27 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी ...

कल्याण : कल्याण-डोंबिवलीत गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले. पावसामुळे वाहतूक कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला असून धरणातील पाण्याची पातळी वाढण्यास सुरुवात झाली आहे.

दमदार पावसामुळे वालधुनी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे वालधुनी आणि शिवाजीनगर, अशोकनगर परिसरातील नागरिकांच्या घरांत पाणी शिरले आहे. महापालिकेने वेळीच दखल घेत १०० पेक्षा जास्त कुटुंबांना पाणी शिरलेल्या भागातून अन्यत्र हलविले आहे. कोळेगाव परिसरातील घरांत पाणी शिरले. त्याठिकाणी महापालिकेच्या वतीने नागरिकांना फूड पाकिटे वाटल्याची माहिती प्रभाग अधिकारी भारत पवार यांनी दिली आहे. कासा रिओ येथील नाला दुथडी भरून वाहत आहे. त्याचबरोबर नांदिवली परिसरात पाणी शिरले आहे. कल्याण स्टेशन परिसरातील मोहम्मद अली चौक ते एसीपी कार्यालयापर्यंत रस्त्यावर पाणी साचले होते. शिवाजी चौकातही पाणी साचले होते. पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. कल्याण-मुरबाड रोडवरील वरप, कांबा, म्हारळ यादरम्यान रस्त्यावर पाणी साचले होते. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक मंदावली होती. कल्याण-शीळ रस्त्यावरही पाणी साचले होते. या भागातही वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. कल्याण उल्हासनगर मार्गावरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहतूक कोंडी झाली होती.

दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, महापालिका क्षेत्रात गेल्या २४ तासांत १७७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण अतिवृष्टीचे आहे. रविवारी रात्रीपासून नागरिकांच्या घरांत पाणी शिरण्याच्या काही घटना सखल भागात घडल्या आहेत. त्याठिकाणच्या नागरिकांना इतरत्र हलविले जात आहे. त्यांना फूड पाकिटे पुरविण्याचे काम केले जात आहे. सोमवारी रात्री नऊ वाजता भरतीची वेळ आहे. पाऊस थांबला नाही तर भरतीच्या वेळी महापालिका प्रशासन सखल भागात जास्त लक्ष ठेवणार आहे.

--------------------------------