शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची ...

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा व बदलापूरच्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी १२२ मीटर असून, पाणीसाठा ५२ टक्के झाला आहे. त्यामुळे १२० मीटर पातळी आणि ४८ टक्के असलेला पाणीसाठा हा दोन दिवसांत पातळी दाेन मीटरने, तर साठा चार टक्क्यांनी वाढला आहे.

तानसा धरणाची पूर्ण संचय पाणीपातळी ४२२ फूट आहे. सध्याची पातळी ४१३.२६ फूट असून, ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर वैतरणा धरणाची एकूण पातळी ५३५.२६ फूट असून, सध्याची पातळी ५१६.४० फूट आहे. यामध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे असाच संततधार पाऊस पडत राहिल्यास हे धरण लवकरच तुडुंब भरून वाहणार आहे. तसेच, एमआयडीसीच्या ३३८.८४ द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या बारवी धरणाची पातळी ६५.६४ मीटर असून, पाणीसाठा ५३ टक्के झाला आहे.