शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची ...

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा व बदलापूरच्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी १२२ मीटर असून, पाणीसाठा ५२ टक्के झाला आहे. त्यामुळे १२० मीटर पातळी आणि ४८ टक्के असलेला पाणीसाठा हा दोन दिवसांत पातळी दाेन मीटरने, तर साठा चार टक्क्यांनी वाढला आहे.

तानसा धरणाची पूर्ण संचय पाणीपातळी ४२२ फूट आहे. सध्याची पातळी ४१३.२६ फूट असून, ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर वैतरणा धरणाची एकूण पातळी ५३५.२६ फूट असून, सध्याची पातळी ५१६.४० फूट आहे. यामध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे असाच संततधार पाऊस पडत राहिल्यास हे धरण लवकरच तुडुंब भरून वाहणार आहे. तसेच, एमआयडीसीच्या ३३८.८४ द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या बारवी धरणाची पातळी ६५.६४ मीटर असून, पाणीसाठा ५३ टक्के झाला आहे.