शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

दमदार पावसामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:25 IST

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची ...

वासिंद : तीन-चार दिवसांपासून धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीसाठा वाढल्यामुळे ठाणे आणि मुंबई शहरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

ठाणे, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या शहापूर तालुक्यातील भातसा, तानसा, वैतरणा व बदलापूरच्या बारवी धरणात पाणीसाठा वाढला आहे. भातसा धरणाची पातळी १२२ मीटर असून, पाणीसाठा ५२ टक्के झाला आहे. त्यामुळे १२० मीटर पातळी आणि ४८ टक्के असलेला पाणीसाठा हा दोन दिवसांत पातळी दाेन मीटरने, तर साठा चार टक्क्यांनी वाढला आहे.

तानसा धरणाची पूर्ण संचय पाणीपातळी ४२२ फूट आहे. सध्याची पातळी ४१३.२६ फूट असून, ७३ टक्के पाणीसाठा झाला आहे, तर वैतरणा धरणाची एकूण पातळी ५३५.२६ फूट असून, सध्याची पातळी ५१६.४० फूट आहे. यामध्ये ७४ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे असाच संततधार पाऊस पडत राहिल्यास हे धरण लवकरच तुडुंब भरून वाहणार आहे. तसेच, एमआयडीसीच्या ३३८.८४ द.ल.घ.मी. क्षमता असलेल्या बारवी धरणाची पातळी ६५.६४ मीटर असून, पाणीसाठा ५३ टक्के झाला आहे.