शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
5
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
6
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
7
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
9
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
10
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
11
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
13
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
14
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
15
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
16
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
17
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
18
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
19
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
20
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २१७५ हेक्टर भातशेती बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:38 IST

५६८८ शेतकऱ्यांना फटका; मुरबाडमध्ये झाले सर्वाधिक नुकसान

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे तर हाल झालेच, शिवाय याचा सर्वाधिक फटका भातशेतीलाही बसला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एक हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान, तर २९५.८० हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा अधिक असे एकूण दोन हजार १७५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. यामध्ये तब्बल पाच हजार ६८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस मागील काही दिवसांत झाला आहे. यामुळे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागांत सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणे ओसंडून वाहू लागल्याने नद्यांनादेखील महापूर आले होते. त्याचे पाणी आजूबाजूच्या भागात शिरल्याने पाणीचपाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. नद्यांमध्ये धरणांचे पाणी सोडल्याने ते ग्रामीण भागातील शेतांमध्ये शिरले. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ६५३.७५ हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले असून चार हजार २८८ शेतकºयांना त्याचा फटका बसल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने दिली.ठाणे जिल्ह्यात २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन हजार १७५ हेक्टरवरील भातशेतीचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. तसेच आॅगस्ट महिन्याच्या सुरु वातीला २ आॅगस्ट ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या पावसामुळे ज्या शेतींचे नुकसान झाले आहेत, त्या शेतातील पिके व फळबागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे