शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २१७५ हेक्टर भातशेती बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:38 IST

५६८८ शेतकऱ्यांना फटका; मुरबाडमध्ये झाले सर्वाधिक नुकसान

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे नागरिकांचे तर हाल झालेच, शिवाय याचा सर्वाधिक फटका भातशेतीलाही बसला आहे. जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील एक हजार ८९७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा कमी नुकसान, तर २९५.८० हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे ३३ टक्केपेक्षा अधिक असे एकूण दोन हजार १७५ हेक्टर भातशेतीचे नुकसान झाले. यामध्ये तब्बल पाच हजार ६८८ शेतकऱ्यांना फटका बसला आहे.जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागांत मुसळधार पाऊस मागील काही दिवसांत झाला आहे. यामुळे कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर आणि मुरबाड तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागांत सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणे ओसंडून वाहू लागल्याने नद्यांनादेखील महापूर आले होते. त्याचे पाणी आजूबाजूच्या भागात शिरल्याने पाणीचपाणी अशी परिस्थिती निर्माण झाली. नद्यांमध्ये धरणांचे पाणी सोडल्याने ते ग्रामीण भागातील शेतांमध्ये शिरले. त्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील एक हजार ६५३.७५ हेक्टरवरील भातशेतीचे नुकसान झाले असून चार हजार २८८ शेतकºयांना त्याचा फटका बसल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक विभागाने दिली.ठाणे जिल्ह्यात २६ जुलै ते २९ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील दोन हजार १७५ हेक्टरवरील भातशेतीचे क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. तसेच आॅगस्ट महिन्याच्या सुरु वातीला २ आॅगस्ट ते ४ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या पावसामुळे ज्या शेतींचे नुकसान झाले आहेत, त्या शेतातील पिके व फळबागांचे पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- अंकुश माने, जिल्हा कृषी अधीक्षक, ठाणे