शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

भिवंडीत पावसाची दमदार हजेरी ; ठिकठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 13:21 IST

धामणकर नाका कल्याण रोड परिसरात साचलेल्या पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापारी हैराण झाले होते.

- नितिन पंडीत

भिवंडी- भिवंडी शहर व ग्रामीण भागात रविवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने सोमवारी शहरात ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. ठिकठिकाणी साचलेल्या या पाण्यामुळे नागरिकांची मोठी दैना उडाली होती. त्याचबरोबर भिवंडी वाडा रस्त्यावर नदीनाका , अंजुरफाटा ते पूर्णा, अंजुरफाटा ते कल्याणनाका , अंजुरफाटा ते खारबाव रस्त्यावर पाणी साचल्याने सकाळी चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते. तर रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून मार्ग काढतांना दुचाकी वाहने व रिक्षा बंद पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

रात्रभर कोसळलेल्या पावसाने शहरातील तीनबत्ती भाजी मार्केट , छ.शिवाजी महाराज चौक , धामणकर नाका , कल्याणनाका, म्हाडा कॉलनी , ईदगा रोड , कारीवली दर्गा रोड , कमला हॉटेल ,गुलजार हॉटेल, निजामपुरा , राहनाळ , नारपोली , पद्मानगर , बस स्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला . तर धामणकर नाका कल्याण रोड परिसरात साचलेल्या पाणी व्यापाऱ्यांच्या दुकानात शिरल्याने व्यापारी हैराण झाले होते. तर नदीनाका व ईदगा रोड परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास झाला.