शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
4
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
5
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
6
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
7
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
8
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
9
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
10
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
11
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
12
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
13
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
14
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
15
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
16
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
17
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
18
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
19
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
20
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !

बाहेर धो धो तरीही ठाणेकरांच्या घशाला कोरड, २५ दशलक्ष लिटर कमी होतेय पाणी पुरवठा

By अजित मांडके | Updated: July 15, 2024 15:07 IST

बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे.

ठाणे : बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे. शहाड पंपीग स्टेशनमध्ये नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा काढण्यात आल्यानंतरही ठाण्याचा पाणी पुरवठा आजही सुरळीत झाला नसल्याचेच चित्र आहे. घोडबंदरसह अनेक भागांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. मागील १० ते १२ दिवसापासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता दुरुस्ती झाली असली तरी देखील गढूळ पाणी खेचण्यात पंपीगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तसेच गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतरही पाणी वाया जात असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी कमी खेचले जात असल्याने त्याचा परिणाम ठाणेकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याचेच चित्र आहे.

ठाण्यात ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तत्पूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा शटडाऊन घेण्यात आला होता. तेव्हा पासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ११ जुलै पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. परंतु त्याच काळात माजीवडा येथे जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता सर्व परिस्थिती सावरली असली तरी देखील ठाणेकरांना आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील बहुतेक भागांना अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने मोठ मोठ्या गृहसंकुलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारी घोडबंदरसह कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, दुरुस्तीची सफाईचे काम झाले असले तरी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गढूळ पाणी येण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पंपीग होत नसल्याने १० दशलक्ष लीटरची तुट येथे दिसत आहे. त्यातही गढूळ पाणी शुध्दीकरण करण्याच्या प्रक्रियेतही १५ दशलक्ष लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. एकूणच पंपीग योग्य पध्दतीने होत नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम झाले आहे. परंतु गढुळ पाण्यामुळे पंपीग योग्य नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून यावर उपाय केले जात आहेत. परंतु ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे.विनोद पवार,उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

टॅग्स :thaneठाणे