शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
4
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
5
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
6
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
18
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
19
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
20
शिमला कराराने सुटलेले भारत-पाकिस्तानमधील वाद; आता पाक देतोय रद्द करण्याची धमकी...

बाहेर धो धो तरीही ठाणेकरांच्या घशाला कोरड, २५ दशलक्ष लिटर कमी होतेय पाणी पुरवठा

By अजित मांडके | Updated: July 15, 2024 15:07 IST

बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे.

ठाणे : बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे. शहाड पंपीग स्टेशनमध्ये नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा काढण्यात आल्यानंतरही ठाण्याचा पाणी पुरवठा आजही सुरळीत झाला नसल्याचेच चित्र आहे. घोडबंदरसह अनेक भागांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. मागील १० ते १२ दिवसापासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता दुरुस्ती झाली असली तरी देखील गढूळ पाणी खेचण्यात पंपीगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तसेच गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतरही पाणी वाया जात असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी कमी खेचले जात असल्याने त्याचा परिणाम ठाणेकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याचेच चित्र आहे.

ठाण्यात ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तत्पूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा शटडाऊन घेण्यात आला होता. तेव्हा पासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ११ जुलै पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. परंतु त्याच काळात माजीवडा येथे जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता सर्व परिस्थिती सावरली असली तरी देखील ठाणेकरांना आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील बहुतेक भागांना अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने मोठ मोठ्या गृहसंकुलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारी घोडबंदरसह कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, दुरुस्तीची सफाईचे काम झाले असले तरी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गढूळ पाणी येण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पंपीग होत नसल्याने १० दशलक्ष लीटरची तुट येथे दिसत आहे. त्यातही गढूळ पाणी शुध्दीकरण करण्याच्या प्रक्रियेतही १५ दशलक्ष लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. एकूणच पंपीग योग्य पध्दतीने होत नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम झाले आहे. परंतु गढुळ पाण्यामुळे पंपीग योग्य नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून यावर उपाय केले जात आहेत. परंतु ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे.विनोद पवार,उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

टॅग्स :thaneठाणे