शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

बाहेर धो धो तरीही ठाणेकरांच्या घशाला कोरड, २५ दशलक्ष लिटर कमी होतेय पाणी पुरवठा

By अजित मांडके | Updated: July 15, 2024 15:07 IST

बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे.

ठाणे : बाहेर धो धो पाऊस पडत असतांना देखील ठाणेकरांच्या घशाला मात्र कोरडच अशी स्थिती आजही कायम आहे. शहाड पंपीग स्टेशनमध्ये नदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा काढण्यात आल्यानंतरही ठाण्याचा पाणी पुरवठा आजही सुरळीत झाला नसल्याचेच चित्र आहे. घोडबंदरसह अनेक भागांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र आहे. मागील १० ते १२ दिवसापासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात आता दुरुस्ती झाली असली तरी देखील गढूळ पाणी खेचण्यात पंपीगमध्ये अडथळे निर्माण होत आहेत, तसेच गढूळ पाणी शुद्ध केल्यानंतरही पाणी वाया जात असून सुमारे २५ दशलक्ष लिटर पाणी कमी खेचले जात असल्याने त्याचा परिणाम ठाणेकरांना मुबलक पाणी मिळत नसल्याचेच चित्र आहे.

ठाण्यात ९ ते ११ जुलै या तीन दिवसांसाठी ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. तत्पूर्वी जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन वेळा शटडाऊन घेण्यात आला होता. तेव्हा पासून ठाणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. त्यात ११ जुलै पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल असे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले होते. परंतु त्याच काळात माजीवडा येथे जलवाहीनीला गळती लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. आता सर्व परिस्थिती सावरली असली तरी देखील ठाणेकरांना आजही कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील बहुतेक भागांना अतिशय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने मोठ मोठ्या गृहसंकुलांना टँकरवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

सोमवारी घोडबंदरसह कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील काही भागांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याचे दिसून आले. या संदर्भात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाशी संपर्क केला असता, दुरुस्तीची सफाईचे काम झाले असले तरी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे गढूळ पाणी येण्याचे प्रमाण अधिक वाढत आहे. त्यामुळे पंपीग होत नसल्याने १० दशलक्ष लीटरची तुट येथे दिसत आहे. त्यातही गढूळ पाणी शुध्दीकरण करण्याच्या प्रक्रियेतही १५ दशलक्ष लीटर पाणी वाया जात असल्याचे दिसत आहे. एकूणच पंपीग योग्य पध्दतीने होत नसल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.

दुरुस्तीचे काम झाले आहे. परंतु गढुळ पाण्यामुळे पंपीग योग्य नसल्याने कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून यावर उपाय केले जात आहेत. परंतु ठाणेकरांनी पाणी जपून वापरावे.विनोद पवार,उपनगर अभियंता, पाणी पुरवठा विभाग, ठामपा

टॅग्स :thaneठाणे