शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:10 AM

सर्वाधिक १४ घारी, आठ ससाण्यांचा समावेश : एसपीसीए संस्थेला त्यांचे जीव वाचवण्यात यश

ठाणे: फेब्रुवारी महिन्यात उष्णतेचा अचानक काही प्रमाणात पारा वाढल्याने ठाणे, डोंबिवली, मुलुंड आणि घोडबंदर या परिसरांत वावरणाऱ्या दुर्मीळ २४ पक्ष्यांना उष्माघाताचा तडाखा बसला आहे. त्यांना प्राणी व पक्षिमित्रांनी वेळीच ठाण्यातील एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. यामध्ये सर्वाधिक १४ घारींसह ससाणे आणि बगळे यासारख्या पक्ष्यांचाही समावेश असून त्यातील काही पक्षी लवकरच आकाशी पुन्हा एकदा भरारी घेण्यास तयार झाल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

आॅक्टोबर आणि मे या महिन्यांत पशुपक्ष्यांना उष्माघाताचा जास्त त्रास होतो. मात्र, यंदा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ठाणे आणि आजूबाजूच्या परिसरात वावरणाºया २४ दुर्मीळ पक्ष्यांना उष्माघात झाल्याचे समोर आले आहे. २० ते २६ फेब्रुवारीदरम्यान ठाणे एसपीसीए या संस्थेच्या रुग्णालयात या पक्ष्यांवर उपचार सुरू आहेत. या जखमींमधील पक्ष्यांमध्ये १४ घारी, आठ ससाणे आणि दोन बगळे असून त्यातील निम्म्या पक्ष्यांना दोन ते चार दिवसांत मुक्तसंचार करण्यासाठी येऊर, कर्नाळा किंवा ज्याज्या परिसरांतून आणले, त्यात्या परिसरांत सोडले जाणार आहे. उर्वरित पक्ष्यांनाही लवकरच सोडण्यात येईल. तसेच अशा पक्ष्यांसाठी सद्य:परिस्थितीनुसार त्यांच्यासाठी खास व्यवस्थाही केली असून तेथे त्यांच्यावर योग्यरीत्या उपचार सुरू असल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास राणे यांनी दिली.विहिरीत पडून कोल्हा जखमीपाण्याच्या शोधात ऐरोली परिसरात आलेला कोल्हा तेथील एका कोरड्या विहिरीत पडला होता. त्याला वनविभाग आणि अग्निशामक दलाने विहिरीतून बाहेर काढले. त्यानंतर, सामाजिक संस्था आणि वनविभागाचे अधिकारी रविवारी (२४ फेब्रुवारीला) ठाणे एसपीसीए या संस्थेत उपचारार्थ दाखल केले होते. तपासणीत त्याच्या मानेला दुखापत झाल्याचे समोर आले असून त्याला पुढे वनविभागाच्या रुग्णालयात हलवले आहे. अशा प्रकारे वर्षभरात साधारणत: पाच कोल्ह्यांना उपचारार्थ आणल्याची माहिती डॉ. राणे यांनी दिली.