शहरं
Join us  
Trending Stories
1
'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
3
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
4
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
5
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
6
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावच जाहीर केली!
7
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
8
बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यावर युक्रेनसारखे हल्ले; बलुच लिबरेशन आर्मीचा मोठा दावा 
9
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
10
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
11
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
12
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
13
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
14
विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडविले; भीषण अपघातात दोन ठार, पाच गंभीर
15
भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीवर काँग्रेस खासदाराचे मोठे वक्तव्य, पीएम मोदींना केली 'ही' मागणी...
16
भारतीय सैन्यानं उडवली दाणादाण, आता पाकिस्तान सैन्य करतंय कचरा साफ! पाक एअरबेसवर सध्या परिस्थिती काय? 
17
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स
18
India Pakistan War :"हमने भेजे कश्मीर में मुजाहिद...", दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी नमाज पठण करणाऱ्या अब्दुल रौफच्या व्हिडिओने पाकिस्तानचा पर्दाफाश
19
मृत्यूने गाठण्यापूर्वी 'ती' "मला जगायचंय" एवढेच म्हणत राहिली अन् अखेरचा घेतला श्वास
20
ट्रम्पनी म्हटलं खूप छान, चीननं केलं उलट काम; असं काय चाललंय ज्याचा भारतावर थेट होऊ शकतो परिणाम?

रासायनिक प्रदूषणाची सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबरला सुनावणी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:15 IST

अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला दंड सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता तीन आठवड्यांचा कालावधी न्यायालयाने दिला होता.

कल्याण : अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवलीतील रासायनिक कारखान्यातून सोडण्यात येणाºया सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना राष्ट्रीय हरीत लवादाने ठोठावलेला दंड सर्वोच्च न्यायालयाने कामय ठेवला आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याकरिता तीन आठवड्यांचा कालावधी न्यायालयाने दिला होता. त्यावर येत्या सोमवार १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीस पर्यावरण खात्याचे प्रधान सचिव व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव या दोघांनी उपस्थित राहणारे आदेश न्यायालयाने दिले आहेत.२०१३ मध्ये वालधूनी, उल्हास नदी आणि कल्याण खाडीत प्रदूषण होत आहे. सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया केली जात नसल्याचा मुद्दा हरीत लवादाकडे ‘वनशक्ती’ संस्थेने मांडला होता. त्यांची याचिका लवादाकडे अद्याप न्यायप्रविष्ट आहे. लवादाने २०१५ मध्ये कल्याण डोंबिवली, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ व बदलापूर पालिका या महापालिकांसह एमआयडीसी, अंबरनाथ व डोंबिवली सांडपाणी प्रक्रिया केंद्र या सगळ््यांना एकूण ९५ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. या दंडाची रक्कम सहा महिन्यांच्या आत कोकण विभागीय आयुक्तांकडे जमा करण्याचे आदेश लवादाने दिले होते. लवादाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे बंधनकारक असताना कारखानदारांनी उच्च न्यायालयात दाद मागितली. उच्च न्यायालयाने लवादाच्या दंड भरण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. या स्थगितीच्या विरोधात ‘वनशक्ती’ने पुन्हा सर्वेाच्च न्यायालयाचे दाद ठोठावले. सर्वोच्च न्यायालयाने लवादाचा दंड ठोठावण्याचा निर्णय कायम ठेवला. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था तीन आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकतात, अशी मुभा दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर आता पुढील सुुनावणी १८ सप्टेंबर रोजी आहे.३० कोटीचा ठोठावला दंडप्रधान सचिव व सदस्य सचिवांनी निरी, आयआयटी आणि ओशनोग्राफीच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा, असे आदेश दिले आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्राला लवादाने ३० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.

टॅग्स :Courtन्यायालय