शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

भिवंडीत ठिकठिकाणी साचले कचऱ्याचे ढीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 00:10 IST

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात ...

भिवंडी : भिवंडीतील पाचही प्रभागामध्ये नियमित कचरा उचलण्यास कंत्राटदार व पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे कचराकुंडीमध्ये जमा झालेला कचरा रस्त्यावर पसरला आहे. शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर अनेक ठिकाणी जंतुनाशक पावडर किंवा औषध फवारणी होत नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे.कचरा साचल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार स्वच्छ भारत अभियान राबवत असताना शहरात असे चित्र आहे. अभियानाच्या सुरूवातीच्यावर्षी फक्त बक्षिसाची ५० लाखांची रक्कम पदरात पाडून घेण्यासाठी पालिका प्रशासनाने आटापिटा केला. मात्र त्यानंतर प्रशासन व आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे या अभियानाचे तीनतेरा वाजले आहेत.या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी लक्ष घालावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्रीपत तांबे यांनी केली आहे. तसेच कचरा न उचलता पालिकेच्या लेखाधिकारी विभागाकडून काढण्यात येणारे कंत्राटदारांचे धनादेश तात्काळ रोखण्यात यावेत अशी मागणीही त्यांनी केली आहे.गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शहरातील विविध भागात गटार नाल्याचे व भुयारी गटाराचे सांडपाणी रस्त्यावर येत आहे. या दुर्गंधीमुळे बाजारहाट करण्यासाठी येणाºया महिला व नागरिकांची गैरसोय होत आहे. कुंडीतील कचरा घंटागाडीतून नियमित उचलून डम्पिंग ग्राऊंडवर टाकणे आवश्यक आहे. असे असताना प्रभूआळी, बीजेपी दवाखाना,जैन मंदिर, बंगालपुरा, शिवाजीनगर, शांतीनगर, ईदगारोड, दर्गारोड, कल्याणरोड, शास्त्रीनगर, पद्मानगर,अंजूरफाटा ,गैबीनगर, म्हाडा कॉलनी,गायत्रीनगर, न्यू - आझादनगर अशा पालिकेच्या पाचही प्रभागात कचºयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.