शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

आरोग्य सेवा कागदावरच

By admin | Updated: June 24, 2016 03:37 IST

बदलापूर शहरवासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २९ पदे मंजूर करण्यात आली. मात्र ही पदे अद्याप पदे भरण्यात आलेली नाही

बदलापूर : बदलापूर शहरवासियांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह २९ पदे मंजूर करण्यात आली. मात्र ही पदे अद्याप पदे भरण्यात आलेली नाही. त्यामुळे बदलापूरची आरोग्य सेवा ही कागदावरच राहिली आहे.राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेअंतर्गत राज्य सरकारने बदलापूर नगरपालिकेसाठी दोन पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, दोन मुख्य परिचारिका, १८ सहायक परिचारिका, एक प्रयोगशाळा तज्ज्ञ, एक औषध निर्माता, दोन डेटा एंट्री आॅपरेटर कम अकाऊंटंट व दोन शिपाई अशी २९ पदे मंजूर केली आहेत. ही पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार असून जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यामतून भरती प्रक्रि या पूर्ण करण्यात येणार आहे. नगरपालिकेचे मुख्याधिकारी या समितीचे सदस्य सचिव आहेत. त्याशिवाय जिल्हा शल्य चिकित्सक, नगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी या समितीचे सदस्य असून युनिसेफ व यूएनएफपीएचे प्रत्येकी एक प्रतिनिधीही या समितीवर आहे. दोन वर्षापूर्वी राज्य सरकारकडून मंजुरी मिळालेली ही पदे भरण्यात यावीत असा ठराव नगरपालिकेने जून २०१५ मध्ये मंजूर करु न जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवला आहे. त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही. याबाबत पाठपुरावा करण्यात नगरपालिका प्रशासन अपयशी ठरले असल्याचा आरोप भाजपा शहर अध्यक्ष संभाजी शिंदे यांनी केला आहे. नगरपालिकेच्या दुबे रूग्णालयात सध्या फक्त बाह्य रु ग्ण तपासणी सुरु असून एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह १९ कर्मचारी तीन लाखाच्या घरात लोकसंख्या असलेल्या शहराला आरोग्य सेवा देत आहेत. दररोज सुमारे २५० ते ३०० रु ग्ण येथे उपचारासाठी येतात. त्यामुळे स्वाभाविकच ही रु ग्णसेवा देताना या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येतो. राज्य सरकारने दोन वर्षापूर्वी बदलापूर नगरपालिकेसाठी मंजूर केलेली २९ पदे भरली गेली असती तर हे चित्र बदलले असते. नागरिकांना चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी नगरपालिकेची रु ग्णसेवा समितीही आहे. या समितीची दर तीन महिन्यांनी बैठक होणे आवश्यक आहे. जुलै २०१५ मध्ये या समितीची पहिली बैठक झाली होती. त्यामधे रु ग्णालय कर्मचारी भरती संदर्भात तातडीने कार्यवाही करण्यासाठी पाठपुरावा करणे, रूग्णालयात नूतनीकरण करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्याशिवाय सरकारी आदेशानुसार लोकसंख्येच्या निकषानुसार शहरात चार प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याबाबतही निर्णय झाला होता. परंतु नंतर समितीची बैठकच झालेली नाही. त्यावरून नागरिकांच्या आरोग्याच्या बाबतीत प्रशासन बेफिकीर असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे.