शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

डेंग्यूपुढे आरोग्य विभाग झाला हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 23:44 IST

खुटलगावात प्रसार; विद्यार्थ्यांचेही आरोग्य धोक्यात; आरोग्य यंत्रणा अपयशी

मुरबाड : तालुक्यातील खुटल बारागाव येथे महिनाभरापासून डेंग्यूची साथ पसरली आहे. मात्र ही साथ आटोक्यात आणण्यात यश येत नसल्याने जिल्हा आरोग्य विभागही हतबल झाला आहे. दररोज डेंग्यूचे नवीन रुग्ण दाखल होत असून तालुका आरोग्य विभाग आणि शिरोशी प्राथमिक केंद्र सपशेल अपयशी ठरल्याचा आरोप खुटल ग्रामस्थांनी केला आहे.तालुक्यातील दुर्गम भागातील खुटल बारागावात महिनाभरापासून डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूचे रुग्ण सापडल्यापासून ग्रामपंचायतीने गावात दोन तिनदा धूर फवारणी केली. नजीकच्या शिरोशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे या गावात उपकेंद्र आहे.दरवर्षी या उपकेंद्राची दुरु स्ती केली जाते. पण, कर्मचारी राहत नसल्याने आणि संपूर्ण आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्याने गावातील डेंग्यूची साथ आटोक्यात येत नसल्याचे ग्रामस्थांचे मत आहे . गावाला लागूनच शासकीय आश्रमशाळा आहे. तेथे तीन-चारशे विद्यार्थी असून त्यांचे आरोग्यही धोक्यात येण्याची शक्यता आहे.खुटल येथील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. डासांचा उगम कुठे आहे ते सापडत नसल्याने ही अडचण तयार झाली आहे.- श्रीधर बनसोडे ,तालुका आरोग्य अधिकारी, मुरबाड

टॅग्स :dengueडेंग्यू