शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपासून सुरू होणार पालघरमधील मुख्यालय; जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे कार्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 23:43 IST

सर्व विभाग आणणार एकाच छताखाली

पालघर : पालघर नवनगर मुख्यालयातील महत्त्वपूर्ण असलेल्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कामकाज येत्या दिवाळीदरम्यान सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसूळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

पालघर-बोईसर रस्त्यावरील ४४० हेक्टर जमिनीवर पालघर मुख्यालय उभे राहत असून सर्व विभाग एकाच छताखाली आणून जिल्ह्याच्या विकासाच्या कामाला गती आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यालयातील कार्यालयाच्या महत्त्वपूर्ण विभागाच्या इमारतीचा ठेका १३९ कोटी ९४ लाख ३ हजार ७७० रुपयांना देण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा ठेका नाशिकच्या प्रकाश कंस्रोवेल प्रा. लि. कंपनीला ३२ कोटी ७९ लाख ८ हजार २५४ रुपयांना देण्यात आला आहे. हे काम जून २०१९ या मुदतीत पूर्ण करणे अपेक्षित होते, मात्र ते झाले नव्हते.

अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदाराने केल्याच्या तक्र ारी पालकमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम जवळपास पूर्ण होत आले असून अंतर्गत फर्निचर आणि विद्युतपुरवठा सुरळीत सुरू करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. गुरसूळ यांनी मुख्यालयाच्या इमारतीची पाहणी करून आढावा घेतला. या वेळी उपजिल्हाधिकारी डॉ. किरण महाजन, सिडकोचे अधीक्षक अभियंता सेवतकर, कार्यकारी अभियंता महादेव खंडागळेकर, काजळे, प्रांताधिकारी धनाजी तोरसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बढे, तहसीलदार सुनील शिंदे, चंद्रसेन पवार उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हा न्यायालयासाठी पश्चिमेऐवजी पूर्वेला नंडोरे येथे जमीन देण्याच्या प्रस्तावाला वकील बार संघटनेने विरोध दर्शविला होता. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषद कार्यालय संकुलाच्या सोबतच उर्वरित जागेत जिल्हा न्यायालय असावे, अशी मागणी केली जात होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी पालघरचा दौरा करीत जागेची पाहणी केली होती. त्यांना जमीन देण्याबाबतचा प्रश्न सुटण्याच्या मार्गावर असून चार प्रस्तावांपैकी एका पर्यायाची निवड त्यांना करावयाची असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यालयाला पाणी देण्यास पालघर न.प.ने नकार दिल्याने पाण्याचे नियोजन, रस्ते आदी उर्वरित कामे लवकर पूर्ण करून दिवाळीदरम्यान मुख्यालयातील दोन महत्त्वपूर्ण कार्यालये सुरू करण्याचा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. 

टॅग्स :palgharपालघर