शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कॅन्सरशी झुंज देत तो झाला दहावी पास

By admin | Updated: June 14, 2017 02:57 IST

वेगवेगळ््या अडचणींवर मात करत, प्रचंड कष्ट करत दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचतो. पण सातत्याने कॅन्सरशी

- जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : वेगवेगळ््या अडचणींवर मात करत, प्रचंड कष्ट करत दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवणाऱ्यांच्या यशोगाथा आपण वाचतो. पण सातत्याने कॅन्सरशी झुंज देत आणि परीक्षेच्या आदल्या दिवशी ब्रेन ट्यूमरचे निदान झाल्याने खचून न जाता परीक्षा देणाऱ्या डोंबिवलीच्या सागर परमार या विद्यार्थ्याने दहावीत ७८ टक्के गुण मिळवत या आजारालाच वाकुल्या दाखवल्या. रोज पेपर दिल्यानंतर रेडिएशन घेत, प्रचंड थकव्यावर मात करत त्याने त्याही अवस्थेत पेपर दिले आणि जिद्दीने यश खेचून आणले. सागर हा डोंबिवली पश्चिमेत जुन्या डोंबिवली परिसरात राहतो. तो ज्युनिअर केजीपासून चंद्रकांत पाटकर शाळेत इंग्रजी माध्यमात शिकतो. सहावीच्या परीक्षेनंतर सुट्टी सुरू असतानाच त्याला कॅन्सरची लागण झाली. पायाला कॅन्सर झाला होता. त्याला सतत उपचारासाठी जावे लागत असल्याने सातवीची परीक्षा देता आली नाही. घरी अभ्यास करून त्याने थेट आठवीची परीक्षा दिली. आठवीत पुन्हा कॅन्सरचा जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्याला नववीची परीक्षा देता आली नाही. दोन वर्षे तो नववीचा अभ्यास करत राहिला. पण जिद्द सोडली नाही. त्याने दहावीचा टप्पा गाठला. दहावीच्या परीक्षेला एक दिवस शिल्लक असताना त्याला बे्रन टयूमर झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. परीक्षा सुरू असतानाच त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. दुपारी दोनला पेपर संपला की तो रेडीएशनसाठी टाटाला जात होता. या उपचारानंतर त्याला प्रचंड थकवा जाणवत असे. त्यामुळे आजारपणापूर्वी केलेल्या अभ्यासाची केवळ उजळणी करण्यापलिकडे त्याच्या हाती काही नव्हते. एकढ्या त्रासानंतरही त्याने एकही पेपर चुकविला नाही. उपचारातही खंड पडू दिला नाही. त्याला इंग्रजीत ७२, गणितात ७१, मराठीत ७०, हिंदीत ८५, सामाजिक विज्ञानात ८४ आणि सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीत ८१ गुण मिळाले. चांगले गुण मिळतील, असा विश्वास त्याला वाटत होता. त्यामुळे ७८ टक्के गुण मिळाल्याचे कळताच आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सागरचे वडील किशोर फोटोग्राफर आहेत, तर आई हिना गृहिणी आहेत. आईने सागरची खूप काळजी घेतली. त्याला पूरक आहार दिला. त्याच्यावर टाटा रुग्णालयात उपचार सुरु होते. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्या अमिता भाटिया यांनी सागर व त्याच्या आई-वडिलांचे चांगल्या प्रकारे समुपदेशन केले. त्याचा त्याला खूप उपयोग झाला. आजारपणात अभ्यास करुन परीक्षा दिली नाही तरी चालेल, असे सांगून त्याच्यावर आई-वडिलांनी कोणतेही दडपण आणले नव्हते. पण सागरने कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, असे मनाशी ठरवले होेते. यशात शाळा, आई-वडील आणि डॉक्टरांचा मोठा सहभाग असल्याचे सागरने सांगितले. त्याला एमबीए किंवा हॉटेल मॅनेजमेंट करायचे आहे. प्रकृतीच्या सुधारणा तपासण्यासाठी केलेल्या त्याच्या चाचण्यांचा अहवाल महिनाभरात मिळणार आहे.