शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
3
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
4
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
5
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
6
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
7
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
8
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
9
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
10
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
11
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
12
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
13
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
14
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
15
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
16
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी
18
Sara Ali Khan : फॅट टू फिट! ९६ किलो वजनाच्या साराने कसं कमी केलं तब्बल ४५ किलो वजन? 'हे' आहे टॉप सीक्रेट
19
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
20
Lunchbox Recipe: झटपट तयार होणारी 'पडवळ करी' एकदा ट्राय करा, दोन घास जास्तच जातील!

‘त्या’ जलमित्राचा सावरकर पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: May 29, 2016 02:48 IST

सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच

ठाणे : सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच प्रभाग क्र. २ चे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. अशा या जलमित्राच्या कार्याची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेत त्यांना वीर सावरकर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे, तर गळतीचे प्रमाण ४५ टक्कयांच्या आसपास आहे. धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन पालिकेने केले आहे. डुंबरे यांनी प्रत्येक विहिरीचे एक कनेक्शन जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दिले आहे. यामुळे परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक रहिवाशांना २४ तास विहिरींचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय, पाणीकपातीच्या काळात येथील रहिवासी पाण्याचा साठा करून ठेवत होते. परंतु, आता या पाण्यामुळे पाण्याचा साठा करण्याचीही गरज त्यांना भासत नाही. त्यांच्या याच कामाची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेतली असून शनिवारी त्यांचा वीर सावरकर पुरस्कार देऊन सन्मान केला. १२८ विहिरींची सफाई- शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ वापरात आहेत, तर २१६ विहिरी वापरात नाहीत. पालिकेने आता शहरातील त्यांची सफाई मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत १२८ विहिरींची सफाई केली आहे.- पालिकेच्या निधीची वाट न बघता डुंबरे यांनी बायर इंडियाच्या मदतीने आझादनगर भागातील चार विहिरींची सफाई करून घेतली आहे. सफाई झाल्यावर आरसीसी टाक्या बसवून या प्रत्येक विहिरीवर नळ लावले आहेत.