शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

‘त्या’ जलमित्राचा सावरकर पुरस्काराने सन्मान

By admin | Updated: May 29, 2016 02:48 IST

सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच

ठाणे : सध्या ठाणे शहरासह जिल्ह्यात पाणीटंचाई सुरू आहे. त्यामुळे पालिकांनी पाण्याची बचत करण्यासाठी विविध स्वरूपाच्या योजना हाती घेतल्या आहेत. परंतु, पालिका योजना राबवत असतानाच प्रभाग क्र. २ चे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी आपल्या प्रभागातील चार विहिरींची साफसफाई करून त्यातील पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे येथील सुमारे २० हजार घरांना पाणीकपातीच्या काळातही या विहिरींतील पाण्याचा वापर होऊ लागला आहे. अशा या जलमित्राच्या कार्याची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेत त्यांना वीर सावरकर पुरस्काराने सन्मानित केले आहे. सध्या ठाणे शहराला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे, तर गळतीचे प्रमाण ४५ टक्कयांच्या आसपास आहे. धरणांची पातळी खालावल्याने सध्या पाण्याचा वापर जपून करा, असे आवाहन पालिकेने केले आहे. डुंबरे यांनी प्रत्येक विहिरीचे एक कनेक्शन जवळच असलेल्या सार्वजनिक शौचालयाला दिले आहे. यामुळे परिसरातील सुमारे २० हजारांहून अधिक रहिवाशांना २४ तास विहिरींचे पाणी उपलब्ध झाले आहे. याशिवाय, पाणीकपातीच्या काळात येथील रहिवासी पाण्याचा साठा करून ठेवत होते. परंतु, आता या पाण्यामुळे पाण्याचा साठा करण्याचीही गरज त्यांना भासत नाही. त्यांच्या याच कामाची दखल ठाण्यातील वीर सावरकर प्रतिष्ठानने घेतली असून शनिवारी त्यांचा वीर सावरकर पुरस्कार देऊन सन्मान केला. १२८ विहिरींची सफाई- शहरात आजघडीला ५५५ विहिरी असून त्यातील ३३९ वापरात आहेत, तर २१६ विहिरी वापरात नाहीत. पालिकेने आता शहरातील त्यांची सफाई मोहीम हाती घेतली असून आतापर्यंत १२८ विहिरींची सफाई केली आहे.- पालिकेच्या निधीची वाट न बघता डुंबरे यांनी बायर इंडियाच्या मदतीने आझादनगर भागातील चार विहिरींची सफाई करून घेतली आहे. सफाई झाल्यावर आरसीसी टाक्या बसवून या प्रत्येक विहिरीवर नळ लावले आहेत.