शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

डोळखांबजवळ तरसाचा झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:42 IST

शेणवा : शहापूर तालुक्यातील जंगलात वणव्याचे सत्र सुरूच असून, फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत ३० ते ३५ ठिकाणी ...

शेणवा : शहापूर तालुक्यातील जंगलात वणव्याचे सत्र सुरूच असून, फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यांत ३० ते ३५ ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर क्षेत्रातील वनसंपदेसह पशुपक्ष्यांचे अन्नही जळून खाक झाले आहे. अन्न व पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येणाऱ्या तरसाचा मृत्यू झाला.

वणवा रोखण्यासाठी वन विभागाकडून लाखो रुपये निधी मंजूर होऊनही वणवा रोखण्यास मात्र वनविभागाला पूर्णतः अपयश आले आहे. दरम्यान, अन्न व पिण्याच्या पाण्याच्या शोधात मानव वस्तीकडे येणाऱ्या बिबट्याला खर्डी व बेडीसगावाजवळ रस्ता ओलांडताना जीव गमवावा लागला होता तर एका नीलगायीलाही वाहनाच्या धडकेत जीव गमवावा लागल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली आहे. आता डोळखांब वनपरिक्षेत्र हद्दीतील हेदवली गावाजवळ तरसाचा मृत्यू झाला आहे. ही घटना समजताच वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

दरम्यान, तरसाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजले नसून शवविच्छेदनासाठी शहापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. शवविच्छेदनातूनच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असे वनपाल हरिश्चंद्र भोईर यांनी सांगितले.