शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

सरकारकडे २५० कोटी मागितले, पण मिळाले सहा कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:43 IST

ठाणे : मागील एक वर्षाहून अधिक काळात कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता महापालिकेने ७७ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाचा ...

ठाणे : मागील एक वर्षाहून अधिक काळात कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता महापालिकेने ७७ कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाचा मुकाबला करण्याकरिता महापालिकेने ३०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. राज्याकडे महापालिकेने २५० कोटींची मागणी केली होती. त्यापैकी अवघे सहा कोटी उपलब्ध झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ठाणे शहराकडे महाविकास आघाडीतील दोन मंत्रिपदे असताना ठाण्याची कोरोना निधीबाबत उपेक्षा झाली आहे.

ठाणे महापालिका हद्दीत मागील वर्षीच्या मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला आहे. वर्ष उलटूनही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. मालमत्ता आणि पाणीपुरवठा विभाग वगळल्यास इतर कोणत्याही विभागाकडून पालिकेला अद्याप अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी यंदा काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. गतवर्षी जे उत्पन्न मिळाले त्यातील मोठा हिस्सा कोरोनासाठी खर्च केला जात आहे. मागील वर्षभरापासून आतापर्यंत कोरोनाच्या मुकाबल्याकरिता ७७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यामध्ये पीपई कीट, सॅनिटायझर, औषधे, कंत्राटी डॉक्टर, आया, वॉर्डबाय, सफाई कामगार, ऑक्सिमीटर, जेवणखाण, बेड आदी खर्चाचा समावेश आहे. तसेच ज्युपिटर येथे उभारण्यात आलेल्या रुग्णालयासाठी २५ कोटींचा खर्च करण्यात आला. एमएमआरडीएकडून त्यासाठीचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही.

दरम्यान, मध्यंतरी कोरोनाचे रुग्ण कमी होत असल्याने त्यासाठी तरतूद केलेला निधी इतर कामांसाठी वर्ग करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. अत्यावश्यक कामांसाठी हा निधी वळविण्यात येणार होता. परंतु पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्याने निधी वळवला नाही. कोरोनासाठी ३०० कोटींचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला असून वेळप्रसंगी कोरोनाचे रुग्ण वाढले तरी त्याचा सामना करण्यासाठी पालिकेची यंत्रणा सज्ज असल्याचा संदेश दिला आहे.

राज्य सरकारने कोरोना मुकाबल्याकरिता २५० कोटींची मदत द्यावी यासाठी महापौरांसह इतर लोकप्रतिनिधी आणि भाजपच्या मंडळींनीदेखील पत्रव्यवहार केला आहे. परंतु पालिका आणि लोकप्रतिनिधींच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसली आहेत. राज्य सरकारने आतापर्यंत केवळ सहा कोटींची मदत दिली आहे. राज्य मंत्रिमंडळात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व गृहनिर्माणमंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांचा समावेश असतानाही राज्य सरकारने मदत देताना हात आखडता का घेतला, असा सवाल केला जात आहे.

................

वाचली