शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

फेरीवाल्यांच्या ‘गॉडफादर’ना धडा शिकवायला हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 01:50 IST

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत २४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर रेल्वे हद्दीतील फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यानुसार, सर्वच रेल्वे पादचारी पुलांवर कारवाईचा धडाका काही दिवसांपासून सुरू झाला आहे. परंतु, केवळ रेल्वे हद्दीतच फेरीवाल्यांनी बस्तान बसवलेले नसून त्यांचा वावर स्टेशन परिसरातही वाढला आहे. ठाणे स्टेशनच्या परिसरात रेल्वे हद्दीत आणि बाहेरही फेरीवाल्यांचा उपद्रव असून वारंवार कारवाई करूनही ते हटलेले नाहीत. मनात आणले तर फेरीवाले एका दणक्यात हटवले जाऊ शकतात. परंतु, यामागे टक्केवारीची, भाड्याची, वसुलीसाखळी कार्यरत असल्याने दुर्घटनेचा विसर पडेपर्यंत कारवाई होईल. त्यानंतर, पुन्हा फेरीवाले आपल्या पथाºया पसरतील. जोपर्यंत या धंद्यातील भ्रष्टाचाराच्या साखळ्या मोडून काढल्या जात नाहीत, तोपर्यंत फेरीवाल्यांच्या उपद्रवाचे समूळ उच्चाटन अशक्य आहे.एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने काढलेल्या मोर्चात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘येत्या १५ दिवसांत फेरीवाल्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही आमच्या स्टाइलने फेरीवाले हटवू’, असा धमकीवजा इशारा दिला. त्यांच्या या इशाºयानंतर सर्वच रेल्वे पुलांवरील फेरीवाल्यांना हटवण्याचे काम सुरू झाले आहे. ठाण्यातही रेल्वे पोलिसांमार्फत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू झाली आहे. परंतु, रेल्वेमार्फत कारवाई झाल्यानंतर फेरीवाले सॅटीसखाली आसरा घेत आहेत. सॅटीसखाली पालिकेच्या पथकाने कारवाई केली, तर पुन्हा फेरीवाले रेल्वेच्या हद्दीत ठाण मांडून बसत आहेत.सुरुवातीला हाताच्या बोटांवर मोजण्याइतके फेरीवाले होते. हळूहळू त्यांंची संख्या वाढत गेली. रेल्वेच्या हद्दीत तब्बल १०० च्या आसपास फेरीवाले बसतात. सॅटीसखाली आणखी काही फेरीवाले पथारी पसरतात. वारंवार कारवाई करूनही फेरीवाले पुन:पुन्हा त्याच जागी बसण्याची हिम्मतच करतात. ठाणे स्टेशन हे अतिशय गजबजीचे ठिकाण आहे. रोज रेल्वेतून सुमारे साडेपाच लाख प्रवासी प्रवास करतात. दरतासाला पाच ते सात हजार प्रवाशांचा लोंढा स्टेशनमधून आत किंवा बाहेर करतो. याच ठिकाणी सॅटीसखाली रिक्षा स्टॅण्ड, टॅक्सी स्टॅण्ड, पोलीस चौकी, दुचाकींचे पार्किंग आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी मांडलेले बस्तान यामुळे पादचाºयांना तारेवरची कसरत करत मार्ग काढावा लागतो. या भागातून बाहेर पडत नाही, तोपर्यंत अनेकांना गुदमरल्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतो.अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडून रोजच्यारोज भाडेवसुली म्हणा किंवा हप्तावसुली केली जाते. ठाणे स्टेशन भागातील चित्र काही वेगळेच आहे. या ठिकाणी एक मोठी साखळी कार्यरत आहे. येथे फेरीवाल्याला बसायचे असेल, तर ६ फुटांना ६०० रुपये, ८ फुटांना ८०० आणि एक हजार फुटांना ११०० रुपयापर्यंत दिवसाचे भाडे वसूल केले जाते. १०० हून अधिक फेरीवाले येथे बसत असतील, तर हे भाडे वसूल करणाºयांची दिवसाची कमाई किती मोठी आहे, याचा अंदाज येऊ शकेल. रात्री ८ वाजता एक वसुली अधिकारी येथे येतो आणि प्रत्येक फेरीवाल्याकडून भाड्याची वसुली केली जाते. त्यातही रात्री भिकाºयांनादेखील रेल्वेच्या हद्दीत झोपण्याची जागा दिली जाते. या भिकाºयांकडून रोज १० रुपये आकारले जात असून पहाटे साडेपाच वाजता त्यांना उठवले जाते. सुमारे २० ते ३० भिकारी रोज या भागात रात्रीचे झोपलेले आढळतात. मागील कित्येक वर्षांपासून हा भाडेवसुलीचा बाजार रेल्वे पोलीस, स्थानिक प्रशासन, वाहतूक पोलीस आणि काही राजकीय मंडळींच्या आशीर्वादाने खुलेआम सुरू आहे. त्यामुळेच आजवर फेरीवाल्यांवर आर या पारची कारवाई झालेली नाही.स्टेशन परिसर आणि बाजार परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी मागील काही महिन्यांपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मोठी मोहीम हाती घेतली होती. अनेक फेरीवाल्यांना त्यांनी सिंघम स्टाइलने धडा शिकवला होता. या भागात एकही फेरीवाला बसू नये, असे आदेशही दिले होते. त्यानुसार, आजही दिवसभर कारवाई सुरू असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या अतिक्रमण विभागाची पथके येथे कार्यरत आहेत. त्यांची गाडी कारवाईसाठी आली की, आधीच मोबाइलचा अलार्म वाजतो. कारवाईच्या भीतीने फेरीवाले काही क्षणासाठी गायब झाल्याचा देखावा करतात. परंतु, पुढल्या क्षणाला पुन्हा फेरीवाल्यांचे बस्तान बसलेले दिसते. स्टेशन परिसर ते जांभळीनाक्यापर्यंतच्या बाजारपेठेत अशा प्रकारे शेकडो फेरीवाल्यांचे जाळे कार्यरत आहे. त्यांच्याकडूनदेखील दिवसाला २०० ते ३०० रुपयांची वसुली केली जाते. काही फेरीवाल्यांचे सामान उचलल्यानंतर ते ठरावीक रक्कम देऊन सोडवले जाते. यासाठीदेखील एक महत्त्वाचा स्पॉट तयार झाला आहे. त्याच ठिकाणी ही डीलिंंग होते, असे फेरीवालेच ठामपणे सांगतात. त्यामुळे कारवाई हे नाटक असल्याने फेरीवाले मुजोर झाले आहेत. स्टेशन परिसरातील फेरीवाले शिवीगाळ, मारामारी करायला घाबरत नाहीत. एखाद्या पादचाºयाने हटकले, तर ‘जा, तुम्हाला काय करायचे ते करा, आमचे कोणीही काही वाकडे करू शकणार नाही’, अशी उद्धट उत्तरे फेरीवाल्यांकडून मिळतात. पोलिसांपासून राजकीय नेत्यांपर्यंत आणि पालिका अधिकाºयांपासून गुंडांपर्यंत साºयांच्या फेरीवाल्यांवर असलेल्या आशीर्वादाचा हा परिपाक आहे. दिवसाचे भाडे देऊनही पालिकेच्या विभागाकडून रोजची २० रुपयांची पावती या फेरीवाल्यांकडून फाडली जाते.एकूणच पुढील काही दिवस फेरीवाल्यांवर कारवाईचा फार्स सुरू राहील. काही दिवसांनंतर पुन्हा येथे फेरीवाल्यांचे बस्तान अटळ आहे. त्यांच्याकडून हप्तावसुली करणारी साखळीच याला कारणीभूत आहे. मनसैनिकांना धडा शिकवायचा असेल, तर त्यांनी फेरीवाल्यांपेक्षा त्यांना संरक्षण देणाºया या गॉडफादरना इंगा दाखवायला हवा.अजित मांडके, ठाणे

टॅग्स :hawkersफेरीवाले