शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
3
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
4
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
5
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
6
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
7
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
8
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
9
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
10
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
12
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
13
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
14
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
15
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
16
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
17
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
18
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
19
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
20
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
Daily Top 2Weekly Top 5

फेरीवाले-व्यापारी संघर्ष पेटला

By admin | Updated: March 30, 2017 06:32 IST

सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे

ठाणे : सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. परंतु, आता तेथील व्यापाऱ्यांविरोधात फेरीवाले एकवटले असून त्यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढून सुभाष पथ मार्ग फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसे केले नाही तर पुढील महिन्यात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता व्यापारी विरुद्ध फेरीवाला असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरातील सुभाष पथ ते जांभळीनाका या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने तेथून एसटी आणि टीएमटीच्या बसेस जाऊ लागल्या आहेत. परंतु, या भागात रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसत असल्याने त्याचा त्रास येथील व्यापाऱ्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी व्यापारी आक्रमक झाल्यानंतर तेथे २४ तास पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाचा जागता पहारा असतो. त्यांच्यामार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात असून ते नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात डम्प केले जात आहे. केंद्राच्या निकषानुसार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही. त्यामुळे हे धोरण तत्काळ राबवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी बुधवारी काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. सुभाष पथ भागातील शेकडो फेरीवाले त्यात सहभागी झाले होते. फेरीवाला धोरणाच्या अनुषगांने पालिकेने नोंदणी करून घेतली आहे. त्यानुसार, आम्हीदेखील या नोंदणीत सहभागी होऊन रक्कमदेखील भरलेली आहे. परंतु, तरीदेखील आमच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला. तसेच सुभाष पथमार्गे जाणारी बससेवा बंद करून पुन्हा जुन्या मार्गाने सुरू करावी. जप्त केलेले साहित्य फेरीवाल्यांना तत्काळ मिळावे आणि सुभाष पथ परिसर फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी या वेळी फेरीवाल्यांनी केली. परंतु, या मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्यानंतर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)