शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

फेरीवाले-व्यापारी संघर्ष पेटला

By admin | Updated: March 30, 2017 06:32 IST

सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे

ठाणे : सुभाष पथ भागातील व्यापाऱ्यांनी फेरीवाल्यांना हटवण्याची मागणी केल्यानंतर पालिकेने त्यांना हटवून ते क्षेत्र ना-फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. परंतु, आता तेथील व्यापाऱ्यांविरोधात फेरीवाले एकवटले असून त्यांनी बुधवारी विविध मागण्यांसाठी पालिकेवर मोर्चा काढून सुभाष पथ मार्ग फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी केली. तसे केले नाही तर पुढील महिन्यात आमरण उपोषण केले जाईल, असा इशारा प्रशासनाला दिला. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता व्यापारी विरुद्ध फेरीवाला असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.ठाणे महापालिकेने स्टेशन परिसरातील सुभाष पथ ते जांभळीनाका या रस्त्याचे रुंदीकरण केल्याने तेथून एसटी आणि टीएमटीच्या बसेस जाऊ लागल्या आहेत. परंतु, या भागात रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसत असल्याने त्याचा त्रास येथील व्यापाऱ्यांना होऊ लागला होता. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईसाठी व्यापारी आक्रमक झाल्यानंतर तेथे २४ तास पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाचा जागता पहारा असतो. त्यांच्यामार्फत येथील फेरीवाल्यांवर कारवाई करून त्यांचे साहित्य जप्त केले जात असून ते नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रात डम्प केले जात आहे. केंद्राच्या निकषानुसार फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. परंतु, अद्यापही ती झालेली नाही. त्यामुळे हे धोरण तत्काळ राबवून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी बुधवारी काढलेल्या मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालय ते महापालिका मुख्यालय असा हा मोर्चा काढण्यात आला होता. सुभाष पथ भागातील शेकडो फेरीवाले त्यात सहभागी झाले होते. फेरीवाला धोरणाच्या अनुषगांने पालिकेने नोंदणी करून घेतली आहे. त्यानुसार, आम्हीदेखील या नोंदणीत सहभागी होऊन रक्कमदेखील भरलेली आहे. परंतु, तरीदेखील आमच्यावर कारवाई का केली जाते, असा सवाल त्यांनी केला. तसेच सुभाष पथमार्गे जाणारी बससेवा बंद करून पुन्हा जुन्या मार्गाने सुरू करावी. जप्त केलेले साहित्य फेरीवाल्यांना तत्काळ मिळावे आणि सुभाष पथ परिसर फेरीवाला क्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी या वेळी फेरीवाल्यांनी केली. परंतु, या मागण्या मान्य न झाल्यास एक महिन्यानंतर आमरण उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)