शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

उल्हासनगरात आजपासून पुन्हा हातोडा, पोलीस संरक्षणासाठी आयुक्तांनी पाठवले पत्र, नेत्यांकडे रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:16 IST

उल्हासनगर : अंबरनाथ ते कल्याण रस्ता रूंदीकरणातील अनधिकृतपणे वाढवलेली बांधकामे गुरूवारी पाडण्यात येणार आहेत.

उल्हासनगर : अंबरनाथ ते कल्याण रस्ता रूंदीकरणातील अनधिकृतपणे वाढवलेली बांधकामे गुरूवारी पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, म्हणून पालिकेने पोलीस उपायुक्तांना पत्र दिल्याने दुकानदारांत घबराट पसरली आहे. त्यांनी मध्यस्थीसाठी नेत्यांकडे रीघ लावली आहे.अंबरनाथ ते कल्याण महामार्गाचे रूंदीकरण झाले. या रूंदीकरणाचा फटका बसलेल्यांनी केलेल्या बहुमजली बांधकांना आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी अटकाव केला. त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी बांधकामे जैसे थे करण्याचे आदेश काढले. त्यानंतरही अवैध बांधकामे थांबत नव्हती. गेल्या महासभेत रूंदीकरणातील बांधकामाचा प्रश्न गाजल्यावर दुसºयाच दिवशी आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून सुरू असलेली बांधकामे तोडली. त्यावरून दुकानदार विरूध्द आयुक्त असा सामना रंगला. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना कामात अडथळा आणल्याच्या मुद्द्यावरून नोटीस पाठवून नगरसेवकपद का रद्द करू नये, ्शी विचारणा केल्याने खळबळ उडाली होती.आयुक्त दुटप्पी : व्यापाºयांचा आरोपरस्ता रूंदीकरणाचा फटका बसलेल्यांपैकी ८० टक्के दुकानदारांनी दुरूस्तीच्या नावाखाली बहुमजली बांधकाम केले. राहिलेल्या व्यापाºयांनी बांधकामे सुरू केल्यावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश काढले. त्यामुळे व्यापाºयांनी आयुक्त दुटप्पी भुमिका घेत असल्याचे आरोप केले.बांधकामे न तुटताही बहुमजली इमारती उभ्याया महामार्गाच्या रूंदीकरणाचे अनेक वर्षे रखडलेले काम तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी राजकीय नेते, दुकानदारांना विश्वासात घेवून अवघ्या १५ दिवसात पार पाडले. त्यात एक हजार ५४ दुकाने व घरे बाधित झाली. त्यातील २६५ पूर्णत: बाधित झाली. अंशत: बाधित झालेल्या दुकानदारांना पालिकेने प्रमाणपत्र दिले असून त्यानुसार दुकानाची दुरस्ती करण्याची तोंडी परवानगी दिली. दुकानदारांनी याचाच गैरफायदा घेत बहुमजली इमारती बांधल्या. काही भूमाफियांनी एक इंचही जागा गेली नसतांना हजारो फुटांच्या बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत.‘दुकानदारांचे शिष्टमंडळ स्वत:हून भेटले’गेल्या आठवडयात सम्राट हॉटेलचे बांधकाम तोडण्याची कारवाई झाल्यानंतर पालिका विरूध्द दुकानदार असा सामना रंगला. दुकानदारांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. त्यानंतर चौधरी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. राजेंद्र चौधरी यांच्यासह व्यापाºयांना मी बोलावले नव्हते. ते स्वत:हून चर्चेसाठी आयुक्त कार्यालयात आल्याची प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली.