शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

उल्हासनगरात आजपासून पुन्हा हातोडा, पोलीस संरक्षणासाठी आयुक्तांनी पाठवले पत्र, नेत्यांकडे रीघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 03:16 IST

उल्हासनगर : अंबरनाथ ते कल्याण रस्ता रूंदीकरणातील अनधिकृतपणे वाढवलेली बांधकामे गुरूवारी पाडण्यात येणार आहेत.

उल्हासनगर : अंबरनाथ ते कल्याण रस्ता रूंदीकरणातील अनधिकृतपणे वाढवलेली बांधकामे गुरूवारी पाडण्यात येणार आहेत. त्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा, म्हणून पालिकेने पोलीस उपायुक्तांना पत्र दिल्याने दुकानदारांत घबराट पसरली आहे. त्यांनी मध्यस्थीसाठी नेत्यांकडे रीघ लावली आहे.अंबरनाथ ते कल्याण महामार्गाचे रूंदीकरण झाले. या रूंदीकरणाचा फटका बसलेल्यांनी केलेल्या बहुमजली बांधकांना आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी अटकाव केला. त्यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर त्यांनी बांधकामे जैसे थे करण्याचे आदेश काढले. त्यानंतरही अवैध बांधकामे थांबत नव्हती. गेल्या महासभेत रूंदीकरणातील बांधकामाचा प्रश्न गाजल्यावर दुसºयाच दिवशी आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून सुरू असलेली बांधकामे तोडली. त्यावरून दुकानदार विरूध्द आयुक्त असा सामना रंगला. शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना कामात अडथळा आणल्याच्या मुद्द्यावरून नोटीस पाठवून नगरसेवकपद का रद्द करू नये, ्शी विचारणा केल्याने खळबळ उडाली होती.आयुक्त दुटप्पी : व्यापाºयांचा आरोपरस्ता रूंदीकरणाचा फटका बसलेल्यांपैकी ८० टक्के दुकानदारांनी दुरूस्तीच्या नावाखाली बहुमजली बांधकाम केले. राहिलेल्या व्यापाºयांनी बांधकामे सुरू केल्यावर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी बांधकामे जैसे थे ठेवण्याचे आदेश काढले. त्यामुळे व्यापाºयांनी आयुक्त दुटप्पी भुमिका घेत असल्याचे आरोप केले.बांधकामे न तुटताही बहुमजली इमारती उभ्याया महामार्गाच्या रूंदीकरणाचे अनेक वर्षे रखडलेले काम तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांनी राजकीय नेते, दुकानदारांना विश्वासात घेवून अवघ्या १५ दिवसात पार पाडले. त्यात एक हजार ५४ दुकाने व घरे बाधित झाली. त्यातील २६५ पूर्णत: बाधित झाली. अंशत: बाधित झालेल्या दुकानदारांना पालिकेने प्रमाणपत्र दिले असून त्यानुसार दुकानाची दुरस्ती करण्याची तोंडी परवानगी दिली. दुकानदारांनी याचाच गैरफायदा घेत बहुमजली इमारती बांधल्या. काही भूमाफियांनी एक इंचही जागा गेली नसतांना हजारो फुटांच्या बहुमजली इमारती उभ्या केल्या आहेत.‘दुकानदारांचे शिष्टमंडळ स्वत:हून भेटले’गेल्या आठवडयात सम्राट हॉटेलचे बांधकाम तोडण्याची कारवाई झाल्यानंतर पालिका विरूध्द दुकानदार असा सामना रंगला. दुकानदारांनी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला. त्यानंतर चौधरी यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. राजेंद्र चौधरी यांच्यासह व्यापाºयांना मी बोलावले नव्हते. ते स्वत:हून चर्चेसाठी आयुक्त कार्यालयात आल्याची प्रतिक्रिया निंबाळकर यांनी दिली.