शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:43 IST

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : भादाणे बंधाऱ्याची केली पाहणी

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाºयामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकºयांना दुबार पीक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाºयाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.या काळू नदीवर बांधलेल्या या बंधाºयावर सगळ्यांनी जलप्रतिज्ञादेखील घेतली. त्याचबरोबर पवित्र असणाºया गंगा नदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात १६०० बंधाºयांचे काम पूर्णशासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीतजास्त बंधारे बांधावयाचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भादाणे बंधाºयामुळे रब्बी पिकांना फायदामुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यांनी तयार केलेला आहे. बंधाºयावर शेतकरी आजघडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाºयाच्या जवळच वीटभट्टी सुरू केली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाºयाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत पाचही तालुक्यांत बंधारे बांधले जात आहेत. या बंधाºयांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. तसेच जनावरांनादेखील हे पाणी उपयुक्त ठरत आहे.