शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:43 IST

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : भादाणे बंधाऱ्याची केली पाहणी

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाºयामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकºयांना दुबार पीक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाºयाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.या काळू नदीवर बांधलेल्या या बंधाºयावर सगळ्यांनी जलप्रतिज्ञादेखील घेतली. त्याचबरोबर पवित्र असणाºया गंगा नदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात १६०० बंधाºयांचे काम पूर्णशासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीतजास्त बंधारे बांधावयाचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भादाणे बंधाºयामुळे रब्बी पिकांना फायदामुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यांनी तयार केलेला आहे. बंधाºयावर शेतकरी आजघडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाºयाच्या जवळच वीटभट्टी सुरू केली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाºयाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत पाचही तालुक्यांत बंधारे बांधले जात आहेत. या बंधाºयांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. तसेच जनावरांनादेखील हे पाणी उपयुक्त ठरत आहे.