शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
4
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
5
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
6
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
7
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
8
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
9
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
10
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
11
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
12
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
13
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
14
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
15
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
16
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

'हरित जिल्ह्यासाठी बंधारे ठरतील वरदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 23:43 IST

एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन : भादाणे बंधाऱ्याची केली पाहणी

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाºयामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकºयांना दुबार पीक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाºयाची गुरुवारी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर ते बोलत होते.या काळू नदीवर बांधलेल्या या बंधाºयावर सगळ्यांनी जलप्रतिज्ञादेखील घेतली. त्याचबरोबर पवित्र असणाºया गंगा नदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाºयात सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गटविकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते.जिल्ह्यात १६०० बंधाºयांचे काम पूर्णशासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोकसहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीतजास्त बंधारे बांधावयाचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्त्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.भादाणे बंधाºयामुळे रब्बी पिकांना फायदामुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यांनी तयार केलेला आहे. बंधाºयावर शेतकरी आजघडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाºयाच्या जवळच वीटभट्टी सुरू केली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाºयाच्या मोहिमेला सुरुवात झाली होती. तेव्हापासून आजतागायत पाचही तालुक्यांत बंधारे बांधले जात आहेत. या बंधाºयांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पिके घेतली जात आहेत. तसेच जनावरांनादेखील हे पाणी उपयुक्त ठरत आहे.