शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
5
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
6
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
7
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
8
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
9
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
10
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
11
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
12
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
13
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
14
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
15
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
16
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
17
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
18
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
19
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
Daily Top 2Weekly Top 5

'हरवलेले मूल मुंबईत मिळाल्याचा आनंदच'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:18 IST

घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले.

- पंकज रोडेकर घरफोडी, चोरी, दरोडे किंवा खून, फसवणूक यासारखे किंवा त्यापेक्षा किचकट गुन्हे आतापर्यंत उघडकीस आणणाऱ्या ठाणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-१ ने नुकतेच देशाची राजधानी असलेल्या दिल्ली आणि राजस्थान येथील एक नव्हे तर तीन अल्पवयीन मुलांचा ठाणे, नवी मुंबई व मुंबईसारख्या शहरांमध्ये शोध घेऊन त्यांना सुखरूपरीत्या स्वगृही धाडण्यात यश मिळवले. यासंदर्भात गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्याशी साधलेला संवाद...अपहरणाचे गुन्हे ठाण्यात किंवा मुंबईत दाखल नसताना ते कसे उघडकीस आणले?ठाणे शहर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सर्वच पोलीस दलातील शाखांना अपहरण यासारखे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यातूनच मिळालेल्या माहितीच्या आधारे, दिल्लीतील मुलीचा विश्वास संपादन केला. त्यातून तिने सुरुवातीला वेगवेगळी खरी वाटेल अशी माहिती देताना, आईवडील नसल्याचे सांगितले. मात्र, शोध घेतल्यावर आईवडील असल्याचे समोर आले. तर, राजस्थान येथील मुलांबाबत स्थानिक पोलिसांना ही मुले ठाणे किंवा नवी मुंबई यासारख्या परिसरांत आहेत, असे समजले होते. त्यानुसार, त्यांचा शोध घेऊन हे गुन्हे उघडकीस आणले.चोरी, हत्या किंवा दरोडा यापेक्षा अपहरण गुन्ह्याचा तपास किती वेगळ्या प्रकारे करावा लागतोे?चोरी, हत्या किंवा दरोडा यासारख्या गुन्ह्यात नेमकी काहीतरी कारणे असतात. मात्र, या गुन्ह्यात तशी काही कारणे नसतात. त्यातच, सर्वोच्च न्यायालयाने १८ वर्षांखालील हरवलेल्या मुलांची मिसिंग अशी नोंद न करता अपहरणाचा गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले. त्यातच, हा गुन्हा इतर गुन्ह्यांपेक्षा निश्चित वेगळा आहे. यामध्ये त्या मुलांचा प्रथम विश्वास संपादन करून त्यांना बोलते करावे लागते. त्यातून त्यांच्याकडून थोडी तरी माहिती मिळाली की, तो गुन्हा उघडकीस येतो.मुले का घर सोडून पळतात?घरची मंडळी लहान वयात लग्न लावून देतील. तसेच आपल्यापेक्षा लहान भावंडांवर आईवडील जास्त प्रेम करतात. तर, एखाद्या परीक्षेत नापास झाल्याने मारण्याच्या भीतीने, घरातील पालकांची भांडणे, वडिलांचे व्यसन त्याचबरोबर प्रेमप्रकरण आदी कारणांतून मुले घर सोडतात.तुम्ही मुलांसह पालकांना काय सांगाल?मुलांपेक्षा पालकांचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. पालकांच्या दिवसेंदिवस मुलांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यातच, कडक वागणूक यामुळे सुरक्षित वातावरण शोधण्यासाठी मुले घरातून पळ काढतात. त्यामुळे पालकांनी पाल्यांमधील बदलाकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच शाळेतील शिक्षकांशी संपर्क साधून आपल्या पाल्याची माहिती घेतली पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमताही लक्षात घेऊन त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा करू नये. त्यातच, पालकांनी आपल्या चुका पहिल्या सुधारल्या पाहिजेत.