शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेघर निवारा केंद्रात आनंदी अन् उत्साही वातावरण; उल्हासनगरात शेकडो बेघरांना मिळाला हक्काचा निवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 17:23 IST

रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, रस्त्याला कडेला निचपत व जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे शेकडो भिक्षुक दिसत असल्याचे चित्र यापूर्वी होते.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : रेल्वे, बस स्थानक, मंदिर, मार्केट, बाजारपेठ, रस्त्याच्या आश्रयाला व निवारा नसलेल्या शेकडो नागरिकांचे पालकत्व शहर बेघर निवारा केंद्राने स्वीकारला. निवारा केंद्रात सर्वसुखसुविधा पुरविल्या जात असून जीवनाचा शेवटचा श्वास आनंदाने हक्काच्या घरात घेणार असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर आहे. 

शहरातील बस स्थानक, रेल्वे स्टेशन, बाजारपेठ, रस्त्याला कडेला निचपत व जीवनाच्या शेवटच्या घटका मोजत असल्याचे शेकडो भिक्षुक दिसत असल्याचे चित्र यापूर्वी होते. बेघर असल्याने स्वाभिमानाने जगता यावे म्हणून केंद्र शासनाने दीनदयाल उपाध्याय यांच्या नावाने शहर बेघर निवारा केंद्र महापालिकेच्या नियंत्रणाखाली सामाजिक संस्था चालवित आहेत. जवळचे कोणतेही नातेवाईक नसलेल्या बेघर नागरिकांचे सर्वेक्षण केल्यावर शहरात ८५ नागरिकांची नोंद झाली. त्यांच्या सोयीसाठी फॉरवर्ड लाईन व गोलमैदान परिसरात महापालिका शाळा क्रं-२७ मधील बंद शाळा इमारत व समाजमंदिरात शहर बेघर केंद्र सुरू केले. बेघर निवारा केंद्रात बेघर नागरिकांना आल्यावर त्यांच्या आरोग्याची काळजी करावी लागते. दर आठवड्याला त्यांची आरोग्य तपासणी केली जाते. तसेच सकाळी चहा, नाष्टा, दुपारी व सायंकाळी जेवण तसेच आठवढ्यातून तीन वेळा नॉनवेज दिला जात आहे.

 शहरात ८० पेक्षा जास्त बेघर नागरिकांना बेघर निवारा केंद्रात हक्काचे घर मिळाले. अंबरनाथ व बदलापूर येथेही दोन बेघर निवारा केंद्र असून त्यामध्ये ६० पेक्षा जास्त वरिष्ठ नागरिक आनंदाने जीवन जगत असल्याची माहिती सत्यवान जगताप यांनी दिली. बेघर निवारा केंद्र चालविणे ही खरी समाजसेवा असून केंद्रात असलेले सर्व जण वरिष्ठ नागरिक आहेत. यामध्ये महिलांचाही भरणा आहे. अनेक बेघर नागरिक स्वतः बाबत माहिती लपवित असल्याची महिती संस्था चालक सांगतात. त्यांना भीती असते की, ज्या आपतीयांनी छेडले, घरारून बाहेर काढले. त्यांच्या पासून दोन हात लांब राहीलेले चांगले. असे त्यांना वाटते. त्यांच्याकडे गेलेतर, पुन्हा रस्त्यावर राहावे लागेल. या भीतीतूनते काही एक बोलत नाहीत. पिण्यासाठी व आंघोळ करण्यासाठी गरम पाणी, साबण, कपडे दिले जाते. 

कोरोनावर अनेकांनी केली मात

 शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर बेघर निवासी केंद्रातील कर्मचारी व बेघर नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र सर्वांनी कोरोनावर मात केल्याची माहिती केंद्राच्या व्यवस्थापक ममता पांडे, महेश सुरवाडे व विजय बिडवान यांनी दिली आहे. तसेच शहरात बेघर असलेले नागरिक असतील तर त्यांनी संस्थे सोबत संपर्क करण्याचे आवाहन पांडे यांनी केले.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर