शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

हंडीच्या सरावाचा नारळ फुटला

By admin | Updated: August 3, 2015 03:20 IST

सरकार दरबारी असलेला दहीहंडीचा मसुदा जैसे थे परिस्थितीत असताना शुक्रवारी शहर-उपनगरांत ‘बोल बजरंग बली की जय...’च्या जयघोषात दहीहंडीच्या सरावाचा नारळ गोविंदांनी फोडला.

मुंबई : सरकार दरबारी असलेला दहीहंडीचा मसुदा जैसे थे परिस्थितीत असताना शुक्रवारी शहर-उपनगरांत ‘बोल बजरंग बली की जय...’च्या जयघोषात दहीहंडीच्या सरावाचा नारळ गोविंदांनी फोडला. मात्र दहीहंडीच्या मसुद्याला जवळपास महिना उलटला असला तरी याबाबतचे धोरण अजूनही अनिश्चितच आहे. त्यामुळे दहीहंडीची उंची आणि गोविंदाचे वय किती असेल याबाबत अजूनही प्रश्नचिन्हच आहे.दहीहंडी उत्सवाला अवघा महिना शिल्लक असताना शहर-उपनगरातील सर्वच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली. गल्लोगल्ली आणि मैदानात असो वा रस्त्यांवर जागेवाल्याला गाऱ्हाणे घालत थरावर थर रचले. माझगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अष्टविनायक गोविंदा पथक, शिवसाई गोविंदा पथक, श्री दत्त क्रीडा मंडळ, स्वस्तिक गोविंदा पथक, जोगेश्वरी येथील जय जवान पथक अशा अनेक पथकांचा जोरदार सराव सुरू झाला आहे. त्यामुळे दहीहंडी धोरणाची पर्वा न करता नव्या एक्क्यांची शोधमोहीम पथकांनी सुरू केली आहे. दहीहंडी उत्सव तोंडावर येऊन ठेपला असताना गेल्या वर्षी उच्च न्यायालयाने दिलेले आदेश कागदावरच आहेत. याविषयी पुन्हा एकदा दहीहंडी समन्वय समिती आणि मंडळांनी धावाधाव सुरू केली. या धोरणाचा अंतिम मसुदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्याकडेही सुपुर्द करण्यात आला. परंतु, अधिवेशनाचे कारण पुढे करत मुख्यमंत्र्यांनी या मसुद्याकडे कानाडोळा केला. त्यामुळे गुरुपौर्णिमेला गोविंदा पथकांचा सरावाचा नारळ फुटला असला तरीही मंडळे आणि समितीमध्ये धोरण निश्चितीविषयी तगमग कायम आहे. उच्च न्यायालयाने दहीहंडीची उंची २० फूट असावी आणि १८ वर्षांखालील मुलांना उत्सवात सहभागी करू नये, तसेच सुरक्षेच्या उपाययोजना पाळाव्यात, असे आदेश दिले. त्याचप्रमाणे उत्सवादरम्यान पथकांवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डनिहाय समित्या स्थापन करण्याचीही सूचना दिली होती. उच्च न्यायालयाचे हे आदेश मानण्याची मानसिकता दहीहंडी समन्वय समितीची झालेली नाही. वयाची अट १२ वर्षांपर्यंत शिथिल करावी, असे समितीचे तसेच गोविंदा मंडळांचे म्हणणे आहे. उंचीची मर्यादादेखील समितीसह गोविंदा मंडळांना अमान्य आहे. याविषयी समिती आणि मंडळांनी अंतिम मसुद्यात महत्त्वाचे मुद्दे मांडल्याचे समजते. या धोरणाचे ‘टेन्शन’ असताना काही राजकीय पक्षही याचे श्रेय लाटण्यासाठी स्पर्धेत असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)