शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

उल्हासनगरात ‘त्या’ इमारतींवर हातोडा

By admin | Updated: August 4, 2015 03:18 IST

महापालिकेने कल्याण-डोंबिवली दुर्घटनेचा धसका घेऊन स्वामी शांतिप्रकाश व महालक्ष्मी या अतिधोकादायक इमारतींवर तोड कारवाई सुरू केली आहे

उल्हासनगर : महापालिकेने कल्याण-डोंबिवली दुर्घटनेचा धसका घेऊन स्वामी शांतिप्रकाश व महालक्ष्मी या अतिधोकादायक इमारतींवर तोड कारवाई सुरू केली आहे. टप्प्याटप्प्याने अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त करणार असल्याची माहिती आयुक्त मनोहर हिरे यांनी दिली. गेल्या महिन्यात झुलेलाल टॉवर्स व पंचशील अपार्टमेंट या अतिधोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत.उल्हासनगरात ३९१ धोकादायक तर २७ अतिधोकादायक इमारती असून पालिकेने दोन वर्षांत ९ धोकादायक इमारती जमीनदोस्त केल्या आहेत. नागरिकांच्या सुरक्षेचा दृष्टिकोन पुढे ठेवून अतिधोकादायक इमारती टप्प्याटप्प्याने जमीनदोस्त करण्याचा निर्णय आयुक्त मनोहर हिरे यांनी घेतला आहे. कॅम्प नं.-१ गोलमैदानमधील महालक्ष्मी व कॅम्प नं.-५ परिसरातील स्वामी शांतिप्रकाश या इमारतीची पाहणी आयुक्तांसह उपायुक्त नितीन कापडणीस, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी करून इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली आहे. महापालिकेने दोन्ही इमारतींवर पाडकाम कारवाई करण्यापूर्वी शेजारील इमारती, दुकाने खाली केली. कॅम्प नं-.५ वसंत दरबार परिसरातील स्वामी शांतिप्रकाश इमारतीत १०८ दुकाने असून महालक्ष्मी इमारत यापूर्वीच खाली केली आहे. शहरातील ३९१ धोकादायक इमारतींना नोटिसा देऊन प्लॉट खाली करण्याचे आवाहनही आयुक्तांनी प्लॉटधारकांना केले आहे. वसंत बहार परिसरात सर्वाधिक अवैध बांधकामे झाली असून त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.महालक्ष्मी व स्वामी शांतिप्रकाश इमारती पाडण्याला ३ ते ४ दिवस लागणार असल्याने परिसरात पोलीस तैनात करून वाहतूककोंडी होऊ नये म्हणून वाहतूक मार्ग बदलण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली आहे. इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी प्रभाग समिती अथवा पालिका मुख्यालयात विनंती केल्यास इमारतीचे सर्वेक्षण करून जमीनदोस्त करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे. (प्रतिनिधी)