शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

अतिधोकादायक इमारतीवर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 23:54 IST

उल्हासनगरमध्ये २३५ इमारतींना नोटिसा; महापालिकेने सुरक्षेची जबाबदारी झटकली

उल्हासनगर : महापालिकेने २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारती घोषित केल्या आहेत. शुक्रवारी मंदार अपार्टमेंट या अतिधोकादायक पाच मजली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू करण्यात आली. धोकादायक इमारतींना नोटिसा देत जीवित आणि वित्तहानीस सर्वस्वी फ्लॅटधारक जबाबदार राहतील, असे सांगून जबाबदारी झटकली.उल्हासनगरात इमारती पडून दरवर्षी अनेकांचे बळी जात आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिकेने २० वर्षे जुन्या इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कारवाई काय झाली, याचा थांगपत्ताही महापालिकेला नाही. पालिकेने नेहमीप्रमाणे इमारतीचे सर्वेक्षण करून २१४ धोकादायक, तर २१ अतिधोकादायक इमारतींची यादी प्रसिद्ध केली आहे. तसेच धोकादायक इमारतींना नोटिसा देऊ न इमारत खाली करण्याच्या सूचना दिल्या. धोकादायक इमारत कोसळून वित्त व जीवितहानी झाल्यास रहिवासीच त्याला सर्वस्वी जबाबदार राहणार असल्याचे नोटिसांत म्हटले आहे. महापालिकेने जबाबदारी झटकली असली, तरी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी करण्यात येत आहे.महापालिकेने घोषित केलेल्या अतिधोकादायक इमारतीच्या यादीतील मंदार अपार्टमेंट ही पाच मजली इमारत पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला. शुक्रवारपासून इमारत पाडण्याचे काम सुरू केल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. सर्व प्रकारचा आढावा घेऊ न इतर अतिधोकादायक इमारती पाडण्याचा निर्णय महापालिका घेऊ शकते, असे शिंपी म्हणाले. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार धोकादायक इमारतीचा आकडा अत्यंत कमी आहे. धोकादायक इमारतीची संख्या एक हजारावर असल्याचा दावा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला. दोन वर्षांत ज्या इमारतीचे स्लॅब पडून बळी गेले आहेत, त्या धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याचे उघड झाल्याचे ते म्हणाले.आपत्कालीन व्यवस्थापन नाहीपावसाळ्यात इमारत पडून काही दुर्घटना घडल्यास पालिकेकडे आपत्कालीन व्यवस्थापनच उपलब्ध नाही. तसेच पूरग्रस्त नागरिकांना पालिका व खाजगी शाळेत ठेवण्याची वेळ महापालिकेवर अनेकदा आली आहे.यातून धडा न घेता पालिकेचे येरे माझ्या मागल्या सुरू असल्याची टीका सर्वस्तरांतून होत आहे. ७०० कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेचे आपत्कालीन व्यवस्थापन नसल्याबाबत टीकेचा सूर उमटतआहे.