शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

मुंब्य्रात आणखी ४६५ बांधकामांवर हातोडा

By admin | Updated: May 8, 2016 02:57 IST

गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही

ठाणे : गेल्या तीन दिवसांपासून मुंब्य्रामध्ये अनधिकृत बांधकामांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत शनिवारी ४६५ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश आहे. आता ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे काम सुरू झाले आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांच्या मार्गदर्शनाखाली सात विशेष पथकांनी सकाळी कारवाई सुरू केली. त्यात मुंब्रा स्टेशन, बाजारपेठ, शंकर मंदिर, गुलाब मार्केट, तन्वरनगर, चाँदनगर, कौसा मार्केट, संजयनगर, अमृतनगर, दर्गा रोड, किस्मत कॉलनी, शादीमहल रोड येथील कारवाईत ४६५ मोठी बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. त्यात राजकीय पक्षांच्या कार्यालयांचाही समावेश होता. मात्र त्यांनीही या कारवाईत फारसा अडथळा आणला नाही. पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या कारवाईची पाहणी करून ढिगारे उपसून रस्ते मोकळे करण्याचे आणि लगेचच तेथे डांबरीकरण करण्याचे आदेश नगर अभियंता रतन अवसरमोल यांना दिले. शनिवारची कारवाई पालिकेचे उपायुक्त संदीप माळवी, संजय हेरवाडे, ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रतन अवसरमोल, कार्यकारी अभियंता गोसावी, कोल्हे, सहायक आयुक्त मंगल शिंदे, दयानंद गोरे, मारुती गायकवाड, शंकर पाटोळे, मदन सोंडे, सागर घोलप यांनी विशेष पथकांद्वारे पार पाडली. या वेळी मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तायडे उपस्थित होते.मुंब्रा येथील कारवाईला विरोध होईल असे वाटत असताना पथकाला फारसा त्रास झाला नाही. तरीही बंदोबस्त ठेवलेला होता. नेहमी विरोधाची भूमिका घेणारे नेतेच या काळात बेपत्ता झाल्याने ही कारवाई विनासायास पार पडल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कारवाई झालेल्या ठिकाणी बाधितांच्या पुनर्वसनाचा मुद्दा फक्त चर्चेत आहे. (प्रतिनिधी)