शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

गोळ्या घालून विचार संपविता येत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 00:26 IST

गोपाळ नेवे यांचे मत : राष्ट्र सेवा दलातर्फे डोंबिवलीत एकलव्यांचा सन्मान

कल्याण : ‘विचारवंतांचे विचार गोळ्या घालून संपविता येत नाहीत. कोणत्याही समस्येवरील ते उत्तर नाही. या सगळ्या परिस्थितीच्या विरोधात समाजाने आवाज उठविण्याची गरज आहे. हा आवाज जोपर्यंत जोरात येणार नाही, तोपर्यंत तुम्ही सुरक्षित नाही आहात’, असे मत राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष गोपाळ नेवे यांनी व्यक्त केले.

राष्ट्र सेवा दलातर्फे एकलव्य सन्मान पुरस्कार सोहळा रविवारी सार्वजनिक वाचनालयात झाला. यावेळी नेवे बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एकलव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नगरसेवक कासिफ तानकी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय पंडित, प्रशांत देशपांडे, नॅशनल उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य फरझाना पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

नेवे म्हणाले, ‘तुम्ही सर्वजण सुरक्षित राहावेत, यासाठी दल कायम प्रयत्नशील राहील. समाजाने आपला आवाज वाढविला तर धर्मजातीच्या नावावर कोणाचा जीव जाणार नाही. सध्या समाजात माणसुकी कमी झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ती वाढविण्याची गरज आहे. ५० वर्षांपूर्वी त्याची गरज नव्हती. सांगली, कोल्हापूर या पूरग्रस्त भागांची पाहणी करताना एक गोष्ट जाणवली की, माणूस संकटात असताना माणुसकी कमी पडली. ही सर्व परिस्थिती प्रत्यक्षात पाहिली, त्यावेळी वेदना झाल्या. त्या वेदना तुम्हाला जाणवल्या पाहिजेत, ही अपेक्षा आहे. तरच, समाजात बदल घडेल. कोणत्याही एकलव्याने श्रद्धा किंवा अंधश्रद्धेनेही आपला अंगठ्याचे दान देऊ नये. आपल्या शिक्षणव्यवस्थेत गुरूची मक्तेदारी प्रस्थापितांकडे आहे. आपण जन्म कुठे घ्यावा, आपल्या हातात नसेल, तरी कर्तृत्व आपल्या हातात आहे, तेव्हा ते निर्माण करा.’

देशपांडे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी कोणत्याही कार्यक्रमाला जाताना वेळेचे पालन केले पाहिजे. आता तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करणार आहात. तेथे वक्तशीर असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात हा एक विचार जरी आत्मसात केला तरी सेवा दल कार्य सफल होईल.’

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे कार्याध्यक्ष नरेश चव्हाण, अविनाश रत्नपारखी, मनोज नागरे, रजिया बागवान, विशाल जाधव, मधुरत्ना पगारे यांनी मेहनत घेतली.शिक्षणामुळेच समाजात बदल घडेलपठाण म्हणाल्या, ‘आपल्या येथे प्रत्येक घरात एक एकलव्य आहे. आपल्याला त्यांना जपायचे आहे. या एकलव्यांनी मेहनत घेतली म्हणूनच आज त्यांना या पुरस्काराच्या रूपाने फळ मिळत आहे. तुमच्या आकांक्षेला मर्यादा असता कामा नयेत. आमच्या संस्थेत येणाºया कोणत्याही विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश नाकारत नाही. शिक्षणहक्क कायद्यांतर्गत कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाते. मुलांना शिक्षणाचे धडे दिले पाहिजेत, तरच आपण समाज बदलू शकतो. काही विद्यार्थ्यांकडे स्वत:चे ओळखपत्र नाही. परंतु, त्यांना प्रवेश नाकारला जात नाही. स्वत:मध्ये क्षमता निर्माण करा, म्हणजे आयुष्यात तुम्हाला काहीही कमी पडणार नाही.’