शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
2
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
3
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
4
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
5
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
6
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
7
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."
8
३० वर्षांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त; फक्त 'इतकी' SIP सुरू करा आणि व्याजापेक्षा जास्त पैसे कमवा
9
अमेरिकन कंपनीनं अचानक नोकरीवरून काढलं; युवकाचं ६ महिन्यातच नशीब पालटलं, महिन्याला ४४ लाख कमाई
10
अमित शाहांची रणनीती, बंद दाराआड पाऊण तास खलबतं; CM फडणवीस अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
11
स्वामी चैतन्यानंदचे सोशल मीडियावरही 'चाळे'; मुलींच्या फोटोंवर कमेंट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल
12
४४ वर्षांपूर्वी 'या' बँकेने जारी केलं होतं पहिलं क्रेडिट कार्ड! आता देशभरात किती लोक वापरतात?
13
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
14
6 लाखांपेक्षाही खाली आली Maruti Baleno ची किंमत, GST कपातीशिवायही मिळतोय ढासू डिस्काउंट 
15
इतकी मोठी झाली उर्मिला-आदिनाथ कोठारेची लेक जिजा, दिसायला आहे आईची कार्बन कॉपी
16
राधाकिशन दमानींच्या DMart चा दुसऱ्या तिमाहीत महसूल वाढीचा धमाका; शेअरवर 'फोकस' वाढणार?
17
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
18
IND W vs PAK W Live Streaming: भारतीय 'रन'रागिणींचा दबदबा; पाक महिला संघ कधीच नाही जिंकला!
19
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
20
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल

पालकमंत्री शिंदे यांचीच प्रतिष्ठा पणाला

By admin | Updated: January 10, 2017 06:36 IST

कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघावर मागील कित्येक वर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने

अजित मांडके / ठाणेकोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघावर मागील कित्येक वर्षे शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने येथे अनपेक्षित मते मिळवल्याने शिवसेनेतील अनेकांच्या भुवया उंचावल्या. वागळे इस्टेट, किसननगर भागात भाजपाने आपली ताकद प्रस्थापित केली असून येथील इंदिरानगर, रूपादेवीपाडा आदी भागांतदेखील भाजपाने आपली बाजू भक्कम केली आहे. साहजिकच, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा या मतदारसंघातील निकालासाठी पणाला लागणार आहे.२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे सलग तिसऱ्यांदा याच मतदारसंघातून निवडून आले. त्यांना तब्बल १ लाख १४८ मते, तर भाजपाच्या संदीप लेले यांना ४८ हजार ४१८, काँग्रेसच्या मोहन तिवारी यांना १७ हजार ७८०, मनसेच्या सेजल कदम यांना ८ हजार ५६०, राष्ट्रवादीच्या डॉ. बिपीन महाले यांना अवघी ३ हजार ७०५ मते मिळाली. शिंदे यांना ५१ हजार ७३० एवढे मताधिक्य प्राप्त झाले. परंतु, भाजपाची या भागात हवादेखील नसताना त्यांनी ४८ हजार मते घेतल्याने सेनेच्या वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत ही मते शिवसेनेला डोकेदुखी ठरू शकतील. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतल्यास येथे चारच्या पॅनलचा फायदा घेण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. तसेच अनेकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर केले आहे. त्यामुळे बदललेल्या या परिस्थितीचा फायदा कोणाला होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे. मागील २०१२ च्या महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे ९ नगरसेवक या मतदारसंघातून निवडून आले होते. परंतु, २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. त्याचा फायदा आताच्या निवडणुकीत शिवसेनेलाच होणार आहे. गतवर्षी आॅगस्ट महिन्यात झालेल्या पोटनिवडणुकीत वॉर्ड क्र .३२ (अ) मध्ये शिवसेना आणि भाजपाने उमेदवार देऊनही अपक्ष उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे हा शिवसेनेला धक्का मानला जात आहे. काँग्रेसमधून भाजपामध्ये दाखल झालेले संजय घाडीगावकर यांनी ही जागा निवडून आणली होती. आताच्या घडीला घाडीगावकर यांच्यावरच वागळे पट्ट्याची जबाबदारी दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची स्थिती येथे तितकीशी चांगली नाही. सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीचा आणि बदललेल्या प्रभागरचनेमुळे काही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी शिवसेना, भाजपात प्रवेश केला आहे. कोपरीत लक्ष्मण टिकमाणी आणि मालती पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला, तर भरत चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. याशिवाय, बसपाचे विलास कांबळे यांनीदेखील भाजपात प्रवेश केला आहे. येत्या काळात ही आवकजावक आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. येथील काही प्रभागांत तर शिवसेनेत कोणाला तिकीट द्यायचे आणि कोणाला नाही, असा पेच निर्माण होणार आहे. त्यात यदाकदाचित युती झाल्यास अनेक ठिकाणी शिवसेनेमध्ये फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्याचा फटका शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.