शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

गोंधळी नगरसेवकांना पालकमंत्री देणार ‘समज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 06:19 IST

प्रभागातील विकासकामांच्या फाइलींना मंजुरी दिली जात नसल्याने कामे नाहीत, अशी ओरड करत केडीएमसी मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे समज देणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : प्रभागातील विकासकामांच्या फाइलींना मंजुरी दिली जात नसल्याने कामे नाहीत, अशी ओरड करत केडीएमसी मुख्यालयात गोंधळ घालणाऱ्या नगरसेवकांना पालकमंत्री एकनाथ शिंदे समज देणार आहेत. मंत्रालयात नुकत्याच झालेल्या एका बैठकीदरम्यान महापौर राजेंद्र देवळेकर यांनी घडलेला प्रकार पालकमंत्र्यांच्या कानावर घातला. यावर त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत तेथे उपस्थित असलेल्या आयुक्त पी. वेलरासू यांनाही विकासकामांबाबत सूचना केल्या.प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याने ज्यांनी आम्हाला निवडून दिले त्या नागरिकांना रोषाला सातत्याने सामोरे जावे लागत आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, त्यात कचराही वेळच्यावेळी उचलला जात नाही, रस्त्यातील खड्ड्यांची समस्याही डोकेदुखी ठरत आहे, यासंदर्भात आयुक्तांची भेट घेऊन समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता तर आयुक्त वेळ देत नाहीत, याबाबत संताप व्यक्त करत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी एक आॅगस्टला महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात गोंधळ घालत खुर्च्यांची मोडतोड करण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी देवळेकर वगळता पदाधिकारी आणि नगरसेवक अशा २५ जणांवर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.सत्ताधारी असताना शिवसेनेच्या नगरसेवकांनी छेडलेले आंदोलन चर्चेचा विषय ठरले असून सत्ताही उपभोगायची आणि विरोधकांची भूमिकाही राबवायची ही सत्ताधाºयांची दुटप्पी भूमिका विरोधीपक्षांसाठी देखील टिकेचा मुद्दा ठरली आहे.दरम्यान, नगरसेवकांनी घातलेल्या गोंधळाची तक्रार देवळेकर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मंत्रालयात एका बैठकीला आयुक्त आणि महापौर गेले असताना त्यांनी शिंदे यांना घडलेला प्रकार कथन केला. शिंदे यांनी नाराजी व्यक्त करताना आयुक्तांनाही मोलाच्या सूचना केल्या.तुमच्याही पाठिशी तसेच उभे राहू!पुनर्वसन धोरण असो अथवा शहरस्वच्छतेचे उपक्रम यांना गती द्यावी, त्याचबरोबर ज्याप्रमाणे आम्ही ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पाठीमागे उभे आहोत, तसे विकासकामांच्या बाबतीत तुमच्याही पाठीशी उभे राहू, असे त्यांनी आयुक्तांना सांगितले.प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र राहून काम केले पाहिजे, ज्या नगरसेवकांनी गोंधळ घातला त्यांनाही समज दिली जाईल, असेही ते म्हणाले.आयुक्तांना सूचना केल्यानंतर आता शिंदे नगरसेवकांना कशापद्धतीने समज देणार? याकडे लक्ष लागले आहे.