शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

टंचाईग्रस्त भागात पालकमंत्र्यांकडून मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:29 IST

आसनगाव : शहापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ही दाहकता पुढील वर्षी भासू नये, म्हणून ठोस उपाययोजना करण्यात ...

आसनगाव : शहापूर तालुक्यात सध्या तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. ही दाहकता पुढील वर्षी भासू नये, म्हणून ठोस उपाययोजना करण्यात प्रशासन कमी पडत असतानाच, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: पुढाकार घेत यंत्रसामग्री स्वखर्चाने ग्रामीण भागात पाठवत तलावातील गाळ काढण्याचे, त्याच्या खोलीकरणाचे काम सुरू केले आहे.

गुरुवारी सकाळी तालुक्यातील माणेखिंड या गावातील तलावाचे काम युवासेना विस्तारक राहुल लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले. त्यांच्याबरोबर शिवसेनेचे तालुकाध्यक्ष मारु ती धिर्डे व टाकीपठारचे योगी फुलनाथ महाराज उपस्थित होते.

दहा दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांनी शहापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागांचा दौरा केला होता. ग्रामस्थांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रामुख्याने ग्रामस्थांनी पाणीटंचाई दूर करण्यासाठी साकडे घातले. पाणीसाठा करणाऱ्या तलावातील गाळ उपसून त्याचे खोलीकरण केल्यास पाणी साठेल व पुढील वर्षी टंचाई भासणार नाही, असे ग्रामस्थांनी यावेळी शिंदे यांना सांगितले.

ग्रामस्थांनी केलेल्या मागणीनुसार एका सामाजिक संस्थेने ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ या मोहिमेला मदत करण्यासाठी माणेखिंड या गावात स्वखर्चाने पोकलेन, जेसीबी, डम्पर पाठवून तलावातील गाळ काढण्याचे काम सुरू केले. पुढील काही दिवसांत मुरबाड तालुक्यातही तलावाची कामे सुरू करणार आहोत, असे लोंढे यांनी सांगितले.