शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

जीएसटी, महारेरा, नोटाबंदी ही तर बिल्डरांसाठी त्सुनामी - निरंजन हिरानंदानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 06:52 IST

नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.

ठाणे - नोटाबंदी, वस्तू आणि सेवाकर तसेच महारेरा कायद्यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये त्सुनामी आली होती. मात्र, परिवर्तनाआधी त्सुनामी येतच असते आणि त्यानंतरच परिवर्तन होत असते. त्यामुळे आताही परिवर्तन होईल, अशी आशा नरेडकोचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी व्यक्त केली.मागील काही वर्षांत संपूर्ण देशातील शहरांपैकी ठाण्यामध्ये सर्वाधिक गृहप्रकल्प उभे राहिले असून त्यामुळे ठाण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. गृहप्रकल्पांसोबतच आता व्यावसायिक क्षेत्राकडेही भर देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या दोन वर्षांत ३० हजार नोकºया तयार होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.उपवन येथे होणाºया एका कार्यक्रमात १२ ते १५ जानेवारी या कालावधीत यंदा प्रथमच नरेडकोच्या माध्यमातून गृहप्रकल्पांचे, तर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत शॉपिंग सोहळ््याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रदर्शनाच्या माध्यमातून ठाणेकरांना विविध वस्तू खरेदी करता येऊ शकणार आहेत. तसेच त्याच ठिकाणी त्यांना सदनिका खरेदीचे पर्यायही उपलब्ध असणार आहेत, अशी माहिती नरेडकोचे उपाध्यक्ष राजन बांदेलकर यांनी दिली.मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशा मुंबई महानगर क्षेत्रातील २०० गृहप्रकल्पांचा पर्याय ग्राहकांपुढे उपलब्ध असणार आहे. या प्रदर्शनामध्ये शासनाच्या धोरणाप्रमाणेच परवडणाºया घरांचे पर्याय उपलब्ध असणार आहेत. कल्याण परिसरातील ३१ लाखांपासून तर ठाण्यात ४५ लाखांपासून पुढे किमती असलेली घरे असणार आहेत, असेही बांदेलकर यांनी सांगितले. मुंबई आणि महाराष्ट्राची जगामध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी दुबईच्या धर्तीवर प्रथमच शॉपिंग फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असल्याचे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी सांगितले. जीएसटी लागू झाल्यानंतर मंदीच्या तडाख्यात सापडलेला बांधकाम व्यवसाय नव्या वर्षात तेजीत येईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. घरखरेदीवेळी ग्राहकांवर पडणारा जीएसटीचा भुर्दंड कमी करण्यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.मंदीच्या तडाख्यातून बिल्डर बाहेरअनोटाबंदी, जीएसटी लागू झाल्यानंतर बांधकाम क्षेत्राला मंदीचा सामना करावा लागला. या तडाख्यातून व्यवसाय काहीसा सावरला असून येत्या वर्षात तो पुन्हा उभारी घेईल, असा दावा बांदेलकर यांनी केला. महारेरा कायद्यामुळे चुकीच्या गोष्टींना आळा बसणार असून त्याचा फायदा ग्राहकांनाच होईल. ग्राहकांना १२ टक्के वस्तू आणि सेवाकर भरावा लागत असून तो कमी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणेGSTजीएसटीNote Banनोटाबंदी