शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

साफसफाई खाजगीकरणाला वाढता विरोध; उल्हासनगर महापालिका आयुक्तांना कंत्राटी कामगारांचे निवेदन, नोकरी जाण्याची भीती 

By सदानंद नाईक | Updated: April 8, 2023 16:37 IST

उल्हासनगर महापालिकेत एकून १५५० सफाई कामगारांचे पदे मंजूर असूनH प्रत्यक्षात ९५० सफाई कामगार कार्यरत आहेत.

उल्हासनगर : महापालिका साफसफाई खाजगीकरणाला वाढता विरोध बघून साफसफाईच्या ठेक्यातील कंत्राटी कामगारांनी नोकरी जाण्याच्या भीतीने एकत्र येत आयुक्ताना निवेदन दिले. या प्रकाराने साफसफाई खाजगीकरणांचा प्रश्न तापणार असल्याचे संकेत कामगार संघटनेने दिले.

 उल्हासनगर महापालिकेत एकून १५५० सफाई कामगारांचे पदे मंजूर असूनH प्रत्यक्षात ९५० सफाई कामगार कार्यरत आहेत. तर तब्बल ६०० पदे रिक्त आहेत. सफाई कामगार कमी असल्याने, त्याचा परिणाम शहरातील साफसफाईवर होतो. अखेर शहर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी महापालिकेने प्रायोगिक तत्वावर प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचा ठेका एका स्थानिक खाजगी कंपनीला दिला. सप्टेंबर २०२१ मध्ये साफसफाईच्या खाजगीकरण प्रस्तावाला महासभेत बहुमतानें मंजुरी दिलीं. या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांचा पाठिंबा होता. त्यानुसार १ मार्च २०२३ पासून २७० साफसफाईच्या मदतीने प्रभाग समिती क्रं-३ अंतर्गत साफसफाईचे काम सुरू केले.

स्वच्छता अभियानात सातत्य ठेवण्यासाठी व नागरिकांना स्वच्छ व सुंदर शहर आरोग्यदायी शहर ठेवण्यासाठी सर्वसाधारण सभेत कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ घेण्याचा निर्णय झाला. या निर्णयावर शहरातून टीकेची एकच झोळ उठली होती. 

दरम्यान कामगार संघटना व विविध सामाजिक संघटनांनी साफसफाईच्या खाजगीकरणला विरोध करून ठेका रद्द करण्याचे निवेदन दिले. तसेच गेल्या आठवड्यात मनसे कामगार संघटनेने महापालिका प्रवेशद्वार समोर ठिय्या आंदोलन करून निषेध केला. यावेळी आयुक्तांनी प्रस्तावात चुकीच्या अटीशर्ती असल्यास कारवाईचे संकेत दिले. याप्रकारने आपल्या नोकऱ्या जातील, या भीतीतून साफसफाई कामातील कंत्राटी कामगारांनी आयुक्त अजीज शेख यांनी भेट घेऊन नोकरी जाऊ देऊ नका. असे निवेदन दिले. याप्रकारने साफसफाईचे खाजगीकरण ठेका वादात जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर