शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
3
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
4
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
5
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
6
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
7
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
8
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
9
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
10
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
11
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
12
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
13
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
14
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
15
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
16
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
17
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
18
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
19
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
20
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले

मलनि:सारण प्रकल्पाला सरकारचा हिरवा कंदील

By admin | Updated: January 11, 2017 07:14 IST

अमृत अभियान योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालाला सरकारच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे

कल्याण : अमृत अभियान योजनेंतर्गत राबविल्या जाणाऱ्या मलनि:सारण प्रकल्पांतर्गत केडीएमसीने सादर केलेल्या अहवालाला सरकारच्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिली आहे. या प्रकल्पांतर्गत १२ सेक्टरमध्ये ही योजना कार्यान्वित केली जाणार आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यासंदर्भातल्या कार्यवाहीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होणार आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या अमृत अभियान योजनेत राज्यातील ४४ शहरांची निवड झाली आहे. त्यात कल्याण-डोंबिवली शहरेही आहेत. याप्रकरणी केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. यात प्रकल्प अहवालासंदर्भात नेमलेल्या राज्यस्तरीय तांत्रिक समितीने केडीएमसीच्या अहवाला मान्यता दिली आहे. त्याला महापालिकेतील संबंधित विभागाने दुजोरा दिला आहे. परंतु, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने याबाबतचे मंजुरीचे पत्र आचारसंहितेनंतरच महापालिकेला मिळेल, असे स्पष्ट करण्यात आले. ज्या भागात मलवाहीन्या नाहीत, तेथे ही मलनि:सारण योजना राबवली जाणार आहे. या योजनेत ८० किलोमीटर मलवाहिन्या आणि १४ पंम्पिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. याआधी केडीएमसी हद्दीत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरूत्थान अभियानांतर्गत मलनि:सारण योजना ही १८ सेक्टरमध्ये राबविण्यात आली होती. आता अमृत अभियानांतर्गत ती उर्वरित १२ सेक्टरमध्ये राबविली जाणार आहे. यात उंबर्डे, सापार्डे, वाडेघर, कोळवली-गंधार, लोकग्राम, कचोरे, टिटवाळा (पूर्व-पश्चिम), डोंबिवली पश्चिमेकडील मोठा गाव या प्रमुख भागांचा यात समावेश आहे. (प्रतिनिधी)