शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

निवडणुकांना हिरवा कंदिल, आज प्रभाग रचना राजपत्रात घोषित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 01:37 IST

प्रशासक दीर्घकाळ राहणे लोकशाहीला घातक आहे. ही खबरदारी घेऊन ठाण्यात दोन वेळा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पहिल्यावेळी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही.

सुरेश लोखंडेठाणे : प्रशासक दीर्घकाळ राहणे लोकशाहीला घातक आहे. ही खबरदारी घेऊन ठाण्यात दोन वेळा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पहिल्यावेळी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. तर दुस-या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना आधी विजयी ठरलेल्या आठ जणांचे सदस्यत्व कायम ठेवल्याविरोधात जनहित याचिका दाखल झाल्याने निवडणूक कार्यक्रमास स्थगिती मिळाली. यामुळे सुमारे दोन वर्षांपेक्षा अधिक काळ प्रथमच ठाणे जिल्ह्यातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत प्रशासक सत्ता अनुभवली. मात्र, आता ४ आॅक्टोबरला प्रभाग रचना राजपत्रात घोषीत होऊन निवडणुकीचा मार्ग मोकळा होत आहे.लोकशाही पद्धतीने निवडणुकांना सामोरे जाण्याऐवजी त्यास विरोध केला. यामुळे ग्रामीण जनता जि.प.च्या लोकप्रतिनिधीपासून वंचित राहिली आहे. तर २७ गावांना स्वत:च्या महापालिकेचे लागलेले वेध अद्यापही पूर्ण करता आले नाहीत.यासाठीचे मातब्बर राजकारण्यांचे डावपेच यशस्वी होऊन त्यांना लक्ष्य साध्य करता आले. २७ गावांचे नागरिक व आदिवासी, ग्रामीण जनता उपेक्षित राहिली. जिल्हा विभाजनानंतर २८ जानेवारी २०१५च्या निवडणुकीला सामारे जाऊन २७ गावांचे उमेदवार जि.प.वर गेले असते तर कल्याण डोंबिवली महापालिकेत जाण्याविरोधात जि.प.चा ठराव त्यांना घेता आला असता. पण लोकप्रतिनिधीत्त्वाच्या अनुभावाअभावी त्यांना ही खेळी खेळता आली नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.राजकीय डावपेचात अडकलेल्या २७ गावांची स्वतंत्र महापालिका सध्या तरी धुसर आहे. याप्रमाणेच जिपच्या पहिल्या निवडणुकीत बहिष्कार टाकणाºया राजकीय पक्षांच्या नाकावर टिच्चून चार अपक्ष उमेदवार बिनविरोध तर चार जण निवडून आले. भले त्यांच्यासाठी केवळ दहा टक्के मतदान झाले. पण ते लोकशाही मार्गाने विजयी झाले. ५३ सदस्यांपैकी आठ सदस्यांवर जि.प. अस्तित्वात आली नाही. त्यासाठी जुलै महिन्यात उर्वरित ४५ सदस्यांची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना झाली. त्यावेळी या आठ जणांचे सदस्यत्व कायम ठेऊन प्रभाग रचना झाली. तेव्हा काहींनी याविरोधात जनहित याचिका दाखल करून सप्टेंबर २०१५च्या निवडणूक अधिसूचनेच्या कार्यक्रमास स्थगिती मिळवली. यामुळे अतिमोलाचा कळव्याचा भूखंड एपीएमसी मार्केटला गेला.राजकीय डावपेचात अडकलेल्या २७ गावांची स्वतंत्र महापालिका सध्या तरी धुसर आहे. याप्रमाणेच जिपच्या पहिल्या निवडणुकीत बहिष्कार टाकणाºया राजकीय पक्षांच्या नाकावर टिच्चून चार अपक्ष उमेदवार बिनविरोध तर चार जण निवडून आले. भले त्यांच्यासाठी केवळ दहा टक्के मतदान झाले. पण ते लोकशाही मार्गाने विजयी झाले. ५३ सदस्यांपैकी आठ सदस्यांमुळे जि.प. अस्तित्वात आली नाही. त्यासाठी जुलै महिन्यात उर्वरित ४५ सदस्यांची निवडणूक घेण्यासाठी प्रभाग रचना झाली. त्यावेळी या आठ जणांचे सदस्यत्व कायम ठेऊन प्रभाग रचना झाली.

टॅग्स :thaneठाणे