शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आपल्याला घरी नेतील या आशेवर ५७ वर्षांपासून आजी वाट पाहत आहे; नातलगांनी फिरवली पाठ

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 9, 2024 10:52 IST

४२ वर्षांपासून रामूला नातेवाईक आणि घराचा पत्ता आठवतच नाही

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेली ५७ वर्षे गंगुबाई (वय ८०) (नाव बदलले आहे.) ठाण्याच्या मनोरुग्णालयात खितपत पडल्या आहेत. आता त्यांना चालता येत नाही. स्वत:ला ओढत त्या पुढे सरकतात. दृष्टिहीन गंगुबाई या रोज घरी जायचेय, नातेवाइकांना भेटायचेय, असे कर्मचाऱ्यांना सांगत असतात. मात्र, त्यांना घरी नेण्यास नातलग तयार नाहीत.

दीड वर्षापूर्वी त्यांच्या ८७ वर्षांच्या भावाची माहिती मनोरुग्णालयास मिळाली. मात्र, तेही ८० वर्षांच्या बहिणीची काळजी घ्यायला तयार नाहीत. तसेच गेली ४२ वर्षे रामू (नाव बदलले आहे.) हेही मनोरुग्णालयात दाखल आहेत. दिव्यांग रामूला आपला पत्ता आजतागायत सांगता आलेला नसल्याने त्याच्या नातलगांचा थांगपत्ता लागलेला नाही. ठाण्याचे मनोरुग्णालय हेच आता रामूचे घर झाले आहे. आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत येथून कुठेही पाठवू नका, अशीही आर्जव रामू करतो.

१९६५ साली गंगूबाई ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाल्या. समुपदेशक, अधीक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र, त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा असल्याने नातेवाइकांचा शोध सुरूच राहिला. ज्यावेळी नातेवाईक सापडले त्यावेळी मात्र त्यांनी हात वर केले. आम्ही हिला ॲडमिट केले नाही. त्यामुळे घेऊन जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नातेवाइकांना गंगुबाईंचे तोंडही पाहायचे नाही.

  • वरचेवर फिट येत असलेल्या दिव्यांग रामूला १९८१ साली धुळे न्यायालयाने मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्याची आकलन शक्ती कमी असल्याने त्याला अद्याप त्याचा पत्ता सांगता आलेला नाही. 
  • २०२१ साली रामूला जागृती पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले, त्यावेळी तो महिनाभरातच परत आला. आपण मनोरुग्णालय सोडून कुठेच जाणार नाही, असे तो सांगतो. 
  • रामू हिंदी भाषिक आहे; पण ४२ वर्षांत तो मराठी शिकला. प्रत्येक कर्मचाऱ्याला तो ओळखतो. इतर रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी गप्पा मारतो. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

चार भिंतीबाहेरील निष्ठूर जग

  • गंगुबाईचा पत्ता शोधण्यासाठी ब्रह्मदेव जाधव या समाजसेवा अधीक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आजीदेखील घराच्या ओढीने, नातेवाईकांना भेटायला मिळावे म्हणून मनाेरुग्णालयात कुढत आहे.
  • ४२ आणि ५७ वर्षे मनोरुग्णालय हेच घर झालेल्या रामू आणि गंगुबाई यांच्या कहाण्या मनोरुग्णालयाच्या चार भिंतीबाहेरच्या जगातील कोत्या ‘मनोरुग्णां’चे दर्शन घडवत आहेत.

४२ वर्षे येथे राहिलेल्या रुग्णाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पुन्हा परत आला. ५७ वर्षे  मनोरुग्णालयात राहिलेल्या महिलेची तुटलेल्या नात्याची नाळ जुळत नाही. नातलग वेगवेगळी कारणे सांगून तिला घरी घेऊन जात नाहीत. या रुग्णांना कुटुंबात, समाजात जगण्याचा अधिकार देण्यासाठी नातेवाइकांनी त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात ठेवू नये. कुटुंब, समाजातील वातावरणाचा आनंद त्यांना द्यावा. तरच खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल.-डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे

टॅग्स :thaneठाणे