शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला घरी नेतील या आशेवर ५७ वर्षांपासून आजी वाट पाहत आहे; नातलगांनी फिरवली पाठ

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: January 9, 2024 10:52 IST

४२ वर्षांपासून रामूला नातेवाईक आणि घराचा पत्ता आठवतच नाही

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: गेली ५७ वर्षे गंगुबाई (वय ८०) (नाव बदलले आहे.) ठाण्याच्या मनोरुग्णालयात खितपत पडल्या आहेत. आता त्यांना चालता येत नाही. स्वत:ला ओढत त्या पुढे सरकतात. दृष्टिहीन गंगुबाई या रोज घरी जायचेय, नातेवाइकांना भेटायचेय, असे कर्मचाऱ्यांना सांगत असतात. मात्र, त्यांना घरी नेण्यास नातलग तयार नाहीत.

दीड वर्षापूर्वी त्यांच्या ८७ वर्षांच्या भावाची माहिती मनोरुग्णालयास मिळाली. मात्र, तेही ८० वर्षांच्या बहिणीची काळजी घ्यायला तयार नाहीत. तसेच गेली ४२ वर्षे रामू (नाव बदलले आहे.) हेही मनोरुग्णालयात दाखल आहेत. दिव्यांग रामूला आपला पत्ता आजतागायत सांगता आलेला नसल्याने त्याच्या नातलगांचा थांगपत्ता लागलेला नाही. ठाण्याचे मनोरुग्णालय हेच आता रामूचे घर झाले आहे. आपल्याला अखेरच्या श्वासापर्यंत येथून कुठेही पाठवू नका, अशीही आर्जव रामू करतो.

१९६५ साली गंगूबाई ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात दाखल झाल्या. समुपदेशक, अधीक्षकांच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. मात्र, त्यांनी दिलेला पत्ता चुकीचा असल्याने नातेवाइकांचा शोध सुरूच राहिला. ज्यावेळी नातेवाईक सापडले त्यावेळी मात्र त्यांनी हात वर केले. आम्ही हिला ॲडमिट केले नाही. त्यामुळे घेऊन जाऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. नातेवाइकांना गंगुबाईंचे तोंडही पाहायचे नाही.

  • वरचेवर फिट येत असलेल्या दिव्यांग रामूला १९८१ साली धुळे न्यायालयाने मनोरुग्णालयात दाखल केले होते. त्याची आकलन शक्ती कमी असल्याने त्याला अद्याप त्याचा पत्ता सांगता आलेला नाही. 
  • २०२१ साली रामूला जागृती पुनर्वसन केंद्रात नेण्यात आले, त्यावेळी तो महिनाभरातच परत आला. आपण मनोरुग्णालय सोडून कुठेच जाणार नाही, असे तो सांगतो. 
  • रामू हिंदी भाषिक आहे; पण ४२ वर्षांत तो मराठी शिकला. प्रत्येक कर्मचाऱ्याला तो ओळखतो. इतर रुग्णांशी आणि कर्मचाऱ्यांशी गप्पा मारतो. त्याला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे.

चार भिंतीबाहेरील निष्ठूर जग

  • गंगुबाईचा पत्ता शोधण्यासाठी ब्रह्मदेव जाधव या समाजसेवा अधीक्षकांनी प्रचंड मेहनत घेतली. आजीदेखील घराच्या ओढीने, नातेवाईकांना भेटायला मिळावे म्हणून मनाेरुग्णालयात कुढत आहे.
  • ४२ आणि ५७ वर्षे मनोरुग्णालय हेच घर झालेल्या रामू आणि गंगुबाई यांच्या कहाण्या मनोरुग्णालयाच्या चार भिंतीबाहेरच्या जगातील कोत्या ‘मनोरुग्णां’चे दर्शन घडवत आहेत.

४२ वर्षे येथे राहिलेल्या रुग्णाचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो पुन्हा परत आला. ५७ वर्षे  मनोरुग्णालयात राहिलेल्या महिलेची तुटलेल्या नात्याची नाळ जुळत नाही. नातलग वेगवेगळी कारणे सांगून तिला घरी घेऊन जात नाहीत. या रुग्णांना कुटुंबात, समाजात जगण्याचा अधिकार देण्यासाठी नातेवाइकांनी त्यांना दीर्घकाळ रुग्णालयात ठेवू नये. कुटुंब, समाजातील वातावरणाचा आनंद त्यांना द्यावा. तरच खऱ्या अर्थाने त्यांचे पुनर्वसन होईल.-डॉ. नेताजी मुळीक, वैद्यकीय अधीक्षक, ठाणे

टॅग्स :thaneठाणे