शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

ग्रामीणमधील विद्यार्थी ‘आॅनलाइन’पासून दूर

By admin | Updated: July 1, 2017 07:37 IST

इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना

जान्हवी मोर्ये । लोकमत न्यूज नेटवर्कडोंबिवली : इयत्ता अकरावी प्रवेशासाठी शहरी भागात आॅनलाइन प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरी व मुंबई उपनगरांतील महाविद्यालयांत प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी बिर्ला कॉलेजमध्ये मार्गदर्शन केंद्र सुरूकरण्यात आले होते. असे असतानाही काही अडचणींमुळे ग्रामीण भागातील जवळपास ४० टक्के विद्यार्थी योग्य प्रकारे आॅनलाइन प्रवेशअर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशाचा प्रश्न तूर्तास तरी प्रलंबित राहणार आहे. त्यांना आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे केंद्रातर्फे सांगण्यात आले. ग्रामीण भागासाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया नाही. त्यामुळे मुंबई व शहरांतील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शाळांकडून फॉर्म घेऊन व्हेरिफाय करायचे होते. मात्र, त्यांना त्याबाबत मार्गदर्शन मिळाले नव्हते. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात जाऊन चौकशी करत होते. या विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले होते. मार्गदर्शन व प्रवेशअर्ज भरणे, या दोन्ही प्रक्रिया होत्या. मात्र कोन, भिवंडी,शहापूर व मुरबाड, अन्य ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना अर्ज भरता आलेले नाही. आॅनलाइन प्रवेशाची तारीख १६ ते २९ जूनपर्यंत होती. प्रवेशाची मुदत संपल्यावर जवळपास ४० टक्के विद्यार्थी प्रवेश अर्ज आॅनलाइन प्रक्रियेद्वारे भरू शकले नाही. आॅनलाइन अर्ज भरण्याकरिता दिलेल्या साइटचा सर्व्हर डाउन झाल्याने प्रवेशप्रक्रिया एक दिवस पूर्णपणे बंद होती. परिणामी, त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला.कल्याणच्या मुथा कॉलेजच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी सांगितले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेशाची सुविधा करण्यात आली होती. सीबीएसई व आयसीएसई या अभ्यासक्रमांतूून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन प्रवेश फॉर्म भरावे लागत नाहीत. विशेषकरून प्रवेश अर्जात बायफोकल व त्याला पर्याय एमटीडीसी हा विषय आॅनलाइनमध्ये नमूद केला होता. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याचे अनेक पालक व विद्यार्थ्यांना ते समजले नाही. त्यामुळे आॅनलाइन अर्ज भरताना तेथे अनेकांनी ‘नो’ हा पर्याय निवडला. एमटीडीसी हा विषय दहावीसाठी असल्याने पालकांचा गोंधळ उडाला. हा पर्याय बायफोकलसाठी असल्याने तो न समजल्याने ६० ते ७० टक्के पालकांसह विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.