शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

ग्रामदान मंडळांना पंचायतींचा दर्जा द्यावा!

By admin | Updated: August 24, 2015 23:12 IST

विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी

जव्हार : विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील विविध छोट्या गावपाड्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून भावे यांनी ग्रामदान मंडळाची संकल्पना मांडली. त्यामुळे राज्यात ती अस्तित्वात आली. कालांतराने लोकशाही मार्गाने व निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. ग्रामदान मंडळ या संकल्पनेत मंडळात अध्यक्ष निवडला जातो. लोकसंख्येच्या एकपंचमांश मतदारांतून हात वर करून अध्यक्ष निवडीची पद्धत आहे. मग, अध्यक्ष सदस्यांची निवड करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करतात. परंतु, आजही सर्वात मोठ्या लोकशाही देशात हात वर करून अध्यक्ष निवड करणे कितपत योग्य आहे. आज ही पद्धत कालबाह्य झाली असून पालघर जिल्ह्यात आजही अस्तित्वात असलेली लाकी, नागझरी, जामसर, बरवाडपाडा ग्रामदान मंडळे रद्द करून त्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. (वार्ताहर)अटी विकासासाठी मारक - या निवेदनात ग्रामदान मंडळे व ग्रामपंचायतींना दिला जाणारा निधी यामध्ये मोठी तफावत असल्याने ग्रामदान मंडळांचा विकास हवा तेवढा होत नाही. ग्रामदान मंडळांच्या ठिकाणच्या जमिनी विकताना त्या गावातीलच ग्रामस्थांना विकणे बंधनकारक आहे. सातबाराच्या उताऱ्यावरही ग्रामदान असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. या सर्व अटी गावाच्या विकासासाठी मारक असून ग्रामदान मंडळांच्या ग्रामस्थांना विविध विकासापासून दूर नेत असल्याचे जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.