शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामदान मंडळांना पंचायतींचा दर्जा द्यावा!

By admin | Updated: August 24, 2015 23:12 IST

विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी

जव्हार : विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील विविध छोट्या गावपाड्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून भावे यांनी ग्रामदान मंडळाची संकल्पना मांडली. त्यामुळे राज्यात ती अस्तित्वात आली. कालांतराने लोकशाही मार्गाने व निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. ग्रामदान मंडळ या संकल्पनेत मंडळात अध्यक्ष निवडला जातो. लोकसंख्येच्या एकपंचमांश मतदारांतून हात वर करून अध्यक्ष निवडीची पद्धत आहे. मग, अध्यक्ष सदस्यांची निवड करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करतात. परंतु, आजही सर्वात मोठ्या लोकशाही देशात हात वर करून अध्यक्ष निवड करणे कितपत योग्य आहे. आज ही पद्धत कालबाह्य झाली असून पालघर जिल्ह्यात आजही अस्तित्वात असलेली लाकी, नागझरी, जामसर, बरवाडपाडा ग्रामदान मंडळे रद्द करून त्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. (वार्ताहर)अटी विकासासाठी मारक - या निवेदनात ग्रामदान मंडळे व ग्रामपंचायतींना दिला जाणारा निधी यामध्ये मोठी तफावत असल्याने ग्रामदान मंडळांचा विकास हवा तेवढा होत नाही. ग्रामदान मंडळांच्या ठिकाणच्या जमिनी विकताना त्या गावातीलच ग्रामस्थांना विकणे बंधनकारक आहे. सातबाराच्या उताऱ्यावरही ग्रामदान असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. या सर्व अटी गावाच्या विकासासाठी मारक असून ग्रामदान मंडळांच्या ग्रामस्थांना विविध विकासापासून दूर नेत असल्याचे जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.