शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

ग्रामदान मंडळांना पंचायतींचा दर्जा द्यावा!

By admin | Updated: August 24, 2015 23:12 IST

विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी

जव्हार : विनोबा भावे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या ग्रामदान मंडळांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जामसर येथील तुकाराम जाधव यांनी पालघर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.राज्यातील विविध छोट्या गावपाड्यांचा विकास व्हावा, या दृष्टिकोनातून भावे यांनी ग्रामदान मंडळाची संकल्पना मांडली. त्यामुळे राज्यात ती अस्तित्वात आली. कालांतराने लोकशाही मार्गाने व निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. ग्रामदान मंडळ या संकल्पनेत मंडळात अध्यक्ष निवडला जातो. लोकसंख्येच्या एकपंचमांश मतदारांतून हात वर करून अध्यक्ष निवडीची पद्धत आहे. मग, अध्यक्ष सदस्यांची निवड करून गावाच्या विकासासाठी आवश्यक ती कामे करतात. परंतु, आजही सर्वात मोठ्या लोकशाही देशात हात वर करून अध्यक्ष निवड करणे कितपत योग्य आहे. आज ही पद्धत कालबाह्य झाली असून पालघर जिल्ह्यात आजही अस्तित्वात असलेली लाकी, नागझरी, जामसर, बरवाडपाडा ग्रामदान मंडळे रद्द करून त्यांना ग्रामपंचायतींचा दर्जा द्यावा, अशी मागणी जाधव यांनी पालघर जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. (वार्ताहर)अटी विकासासाठी मारक - या निवेदनात ग्रामदान मंडळे व ग्रामपंचायतींना दिला जाणारा निधी यामध्ये मोठी तफावत असल्याने ग्रामदान मंडळांचा विकास हवा तेवढा होत नाही. ग्रामदान मंडळांच्या ठिकाणच्या जमिनी विकताना त्या गावातीलच ग्रामस्थांना विकणे बंधनकारक आहे. सातबाराच्या उताऱ्यावरही ग्रामदान असा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे. या सर्व अटी गावाच्या विकासासाठी मारक असून ग्रामदान मंडळांच्या ग्रामस्थांना विविध विकासापासून दूर नेत असल्याचे जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.