शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:56 IST

प्रचारात रंगत : काही ठिकाणी मात्र एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात रंगला आहे. आठ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. मात्र, जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पुरस्कृत उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. या तिन्ही पक्षांचे  विधानसभेत जमले.  मात्र, त्या राजकीय डावपेचांना न जुमानता स्थानिकांकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुका आपल्याच मर्जीने लढविल्या जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५८ च्या निवडणुका होत आहेत. एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींपैकी आठ बिनविरोध ठरल्या. तर उर्वरित १४३ च्या निवडणुकांसाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवार राजकीय पक्षांचे पुरस्कृत आहेत, पण राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधाऱ्यांनी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीच्या राजकारणास विचारात न घेता आपल्या गावातील एकमताचा आदर व त्यातील एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढण्यास गावकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.  

 निकालानंतर बदलू शकते चित्रn ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आक्रमकतेकडे 'वेट अँन्ड वॉच, ॲफ्टर कॅच ! चे सूत्र महाविकास आघाडीने अवलंबले आहे. n जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य अधिक आहे. भिवंडीला भाजप, शहापूर, मुरबाडला शिवसेना आणि कमी अधिक प्रमाणात कल्याण अंबरनाथलाही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नाते, संबंधावर उमेदवार दिला जातो. जिल्ह्यात काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत आहेत. वरप गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकली आहे, पण काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार प्रतिस्पर्धीही आहेत.  - दशरथ तिवरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ग्रामपंचायती निवडणुकीत एकाच घरातील व्यक्ती एकमेकांविरोधात लढतात. तेव्हा पक्ष म्हणून आपण त्यांच्यात भांडण लावणे योग्य नाही.  त्यांच्यात फूट पाडून या निवडणुका लढल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही या निवडणुकांत रस घेतलेला नाही. मी खासदार हाेतो तेंव्हाही या निवडणुकांमध्ये सहभागी झालेलो नाही. या निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत.  - सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

नातेसंबंधांना महत्त्वस्वपक्षाचे उमेदवार स्थानिक नातेसंबंध, पाठबळ विचारात घेऊन या निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेले आहेत. त्यांचा प्रचारही गावांत शिगेला पोहोचला आहे. एक हजार ४७२ सदस्यांसाठी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये ४१८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार उत्तम आहे. गावपाड्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीतही शिवसेनेसह आघाडीचे पुरस्कृत मोठ्या प्रमाणात विजयी होतील. त्यासाठी जिल्ह्याचा एक आढावा घेण्यात येत आहे.  -प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक