शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांत महाआघाडीचे ‘तीन तिघाडे...’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 00:56 IST

प्रचारात रंगत : काही ठिकाणी मात्र एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत

सुरेश लोखंडे लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा प्रचार जोरात रंगला आहे. आठ ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. मात्र, जिल्ह्यातील १४३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रचारात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचे पुरस्कृत उमेदवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. या तिन्ही पक्षांचे  विधानसभेत जमले.  मात्र, त्या राजकीय डावपेचांना न जुमानता स्थानिकांकडून ग्रामपंचायतींच्या निवडणुका आपल्याच मर्जीने लढविल्या जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींपैकी १५८ च्या निवडणुका होत आहेत. एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींपैकी आठ बिनविरोध ठरल्या. तर उर्वरित १४३ च्या निवडणुकांसाठी दोन हजार २३१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील बहुतांश उमेदवार राजकीय पक्षांचे पुरस्कृत आहेत, पण राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या पुरस्कृत उमेदवारांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून लढत आहेत. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला ठाणे जिल्हा परिषदेच्या सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधाऱ्यांनी सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे राज्य व जिल्हा पातळीच्या राजकारणास विचारात न घेता आपल्या गावातील एकमताचा आदर व त्यातील एकमेकांच्या सहमतीने निर्णय घेऊन ग्रामपंचायतींच्या निवडणुका लोकशाही मार्गाने लढण्यास गावकऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे पाहायला मिळत आहे.  

 निकालानंतर बदलू शकते चित्रn ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या रणधुमाळीकडे राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. या निवडणुकीत आक्रमकतेकडे 'वेट अँन्ड वॉच, ॲफ्टर कॅच ! चे सूत्र महाविकास आघाडीने अवलंबले आहे. n जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीच्या तुलनेत शिवसेनेचे प्राबल्य अधिक आहे. भिवंडीला भाजप, शहापूर, मुरबाडला शिवसेना आणि कमी अधिक प्रमाणात कल्याण अंबरनाथलाही कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती आहे.

 ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक नाते, संबंधावर उमेदवार दिला जातो. जिल्ह्यात काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार एकमेकांच्या पाठिंब्यावर लढत आहेत. वरप गावची ग्रामपंचायत राष्ट्रवादीने बिनविरोध जिंकली आहे, पण काही ठिकाणी आघाडीचे उमेदवार प्रतिस्पर्धीही आहेत.  - दशरथ तिवरे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

ग्रामपंचायती निवडणुकीत एकाच घरातील व्यक्ती एकमेकांविरोधात लढतात. तेव्हा पक्ष म्हणून आपण त्यांच्यात भांडण लावणे योग्य नाही.  त्यांच्यात फूट पाडून या निवडणुका लढल्या जाऊ नयेत म्हणून आम्ही या निवडणुकांत रस घेतलेला नाही. मी खासदार हाेतो तेंव्हाही या निवडणुकांमध्ये सहभागी झालेलो नाही. या निवडणुका बिनविरोधच झाल्या पाहिजेत.  - सुरेश टावरे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

नातेसंबंधांना महत्त्वस्वपक्षाचे उमेदवार स्थानिक नातेसंबंध, पाठबळ विचारात घेऊन या निवडणुकांमध्ये ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी झालेले आहेत. त्यांचा प्रचारही गावांत शिगेला पोहोचला आहे. एक हजार ४७२ सदस्यांसाठी होत असलेल्या या निवडणुकांमध्ये ४१८ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता ९९४ सदस्यांसाठी १५ जानेवारीला मतदान आहे.

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार उत्तम आहे. गावपाड्यांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने या निवडणुकीतही शिवसेनेसह आघाडीचे पुरस्कृत मोठ्या प्रमाणात विजयी होतील. त्यासाठी जिल्ह्याचा एक आढावा घेण्यात येत आहे.  -प्रकाश पाटील, जिल्हाप्रमुख, शिवसेना

 

टॅग्स :thaneठाणेElectionनिवडणूक