शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

ठाणे जिल्ह्यातील 95 हजार रेशनकार्डधारकांचा धान्यपुरवठा बंद; राज्य शासनाने केली कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 23:24 IST

यापुढे केवळ गरजू कुटुंबांना देणार लाभ

सुरेश लोखंडेठाणो : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागामधील ज्या शिधापत्रिकाधारकांनी सहा महिन्यांपासून रेशनिंग दुकानांतून त्यांच्या धान्याचा लाभ घेतला नाही, अशा एक लाख नऊ हजार ९०५ कार्डधारकांपैकी तब्बल ९४ हजार ९०७ कार्डधारकांचा अन्नधान्यपुरवठा आता कायमचा बंद केला आहे. त्यांच्या या अन्नधान्याचा लाभ कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये नोकरीस मुकलेल्या गरजू कुटुंबीयांना वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

 ‘जिल्ह्यात दीड लाख शिधापत्रिका बंद करण्याच्या हालचाली’ या मथळ्याखाली लोकमतने १८ नोव्हेबर रोजी वृत्तप्रसिद्ध करून प्रशासनाच्या हालचाली उघड केल्या होत्या. यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांच्या जागी गरजू कुटुंबीयांच्या नावांचा समावेश करून त्याना या अन्नधान्याचा लाभ दिला जाणार आहे. सहा महिन्यांत एकदाही त्यांनी अन्नधान्य खरेदी केलेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांचे आता अन्नधान्य बंद केले आहे.

ग्रामीण भागातील सुमारे एक लाख ४८ हजार कार्डधारकांपैकी बहुतांशी सधन कुटुंबांकडून स्वस्त धान्य खरेदी केले जात नाही, तर शहरी भागातील प्राधान्य कुटुंब यादीतील सात लाख ४४ हजार ४७७ कार्डधारकांपैकी पाच लाख १६ हजार ७७५ कार्डधारक दरमहा अन्नधान्य खरेदी करत असल्याचे दिसत आहे.

लवकरच बडगा

जिल्ह्यातील या साडेसात लाख कडधारकांपैकी अंत्योदय योजनेचे शहरी भागात १३  हजार १३० लाभार्थी आहेत. त्यापैकी ११ हजार ६२६ लाभार्थी आहेत. शिधावाटप विभागाच्या ‘फ’ परिमंडळ विभागाने कारवाई करून आजपर्यंत ९४ हजार ९०७ कार्डधारकांवर ‘एनईआर’ कारवाई  केली आहे. सहा महिन्यांपासून अन्नधान्याची उचल न केलेल्या या कार्डधारकांपैकी ८६.३५ टक्के कुटुंबीयांवर कारवाई झाली आहे. उर्वरित १४ हजार ९९८ या ३५ टक्के कार्डधारकांवर ही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. 

टॅग्स :thaneठाणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार