शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

धान्य बँकेचे जाळे आता महाराष्ट्रभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 22:49 IST

पन्नास हजार किलो धान्य देण्याची क्षमता; एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न पुरवण्याचा संकल्प केलेल्या उज्ज्वला बागवाडे यांच्या ‘धान्य बँक’ या अभिनव उपक्रमाचे जाळे आता महाराष्ट्रभर पसरणार आहे. गरजू सामाजिक संस्थांना अन्नधान्य पुरविण्याचा संकल्प त्यांनी नव्या वर्षांत केला आहे. या गरजू संस्था असणाऱ्या गावांत त्या धान्यबँकेचे केंद्र सुरू करणार आहेत. ‘एक गाव, एक धान्य बँक, दोन संस्था... एक सुरूवात’ अशी संकल्पना वुई टुगेदर संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.आतापर्यंत या संस्थेने आपल्या धान्यपेढीतून हजारो किलो धान्य पुरवले आहे. गोरगरिबांच्या अन्नदात्री ठरलेल्या बागवाडे यांनी सुरूवातीला बीड जिल्ह्यातील सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्था दत्तक घेतल्या. सध्या १९ संस्थांना वुई टुगेदरच्या माध्यमातून धान्य पुरविले जात आहे. त्यापैकी नऊ संस्थांना एक महिनाआड असे वर्षातले सहा महिने धान्य दिले जाते तर १० स्थानिक पातळीवरच्या संस्थांचे पालकत्व या संस्थेने घेतले आहे. नऊ संस्थांमध्ये सेवाश्रम, शांतीवन आणि श्रद्धा फाऊंडेशन या संस्थांसह माऊली मोखाडा, माऊली सिंधुदुर्ग, नगर येथील संकल्प संस्था आणि स्नेहप्रेम, पुणे येथील आजवळ, अमरावती येथील प्रश्नचिन्ह तर दहा संस्थांमध्ये समतोल, शबरी, सुहीत, घरकुल यांसारख्या संस्थांचा समावेश आहे. १२ मैत्रिणींपासून सुरू केलेल्या या उपक्रमाशी आता १४३ गृहिणी जोडल्या गेल्या आहेत. ५० हजार किलो धान्य देण्याची ताकद आता या संस्थेची असल्याचे बागवाडे यांनी सांगितले. दर महिन्याला दाते मंडळी या संस्थेच्या ग्रीन बँकमध्ये आपले पैसे जमा करतात आणि संस्थांना ही मदत धान्यस्वरुपात केली जाते. दर वर्षाला १०० रुपये महिना प्रमाणे प्रत्येकी १२०० रुपये किंवा त्याहून अधिकही रुपये प्रत्येक कमवता हात आपली मदत देत असतात. आता हे कार्य इतर गावांतही पोहोचविण्याचा संकल्प संस्थेने केला आहे.धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडले जाणारया उपक्रमात प्रत्येक गावातील गरजू संस्था निवडल्या जाणार आहेत. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्ती या मोहिमेशी जोडल्या जातील आणि स्वत:बरोबर त्यांच्या नातेवाईक, मित्रमैत्रिणी जोडल्या जातील. परिणामी एका विचाराची सर्व मंडळी एकत्र येऊन प्रामाणिक काम करणाºया संस्थाच्या मागे शिधेच्या रुपाने उभ्या राहतील अशा प्रकारची ही संकल्पना आहे. यामुळे धान्यबँकेशी प्रत्येक गाव जोडण्यात येणार असल्याचा मानस बागवाडे यांनी व्यक्त केला आहे. अन्नदानाची इच्छा असणाºया व्यक्तींनी bagupb@gmail.com यावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. त्या माध्यमातून संस्थांना मदत केली जाणार आहे. यामुळे संस्था जबाबदार होतील, स्थानिक दानशूरांना मी माझ्या गावातील संस्थेला मदत केल्याचे समाधान मिळेल आणि त्यांना मदत करण्यासाठी हुरूप येईल.