शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

जि.प. अध्यक्षांपाठोपाठ आता कर्मचारीही होणार ‘बेघर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:02 IST

निवासी इमारती पाडणार; मुख्य इमारत पाडल्यापासून दालने निवासस्थानी

ठाणे : जिल्हा परिषदेची मुख्य इमारत गेल्या तीन वर्षांपासून धोकादायक घोषित करण्यात आली असून वागळे इस्टेट येथील कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असलेली धोकादायक इमारतदेखील येत्या आठवडाभरात पाडण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू आहेत. या निवासी इमारतींमधील कर्मचाऱ्यांची आता अन्यत्र निवासव्यवस्था करावी लागणार आहे. जिल्हा परिषदेची मुख्य इमारत रिकामी केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांसह अनेकांना सध्या आपल्या निवासस्थानांमधून कामकाज पाहावे लागत असताना आता कर्मचाºयांच्या डोक्यावरील छप्पर जाणार आहे. अर्थात, त्यांची तात्पुरती पर्यायी व्यवस्था केली जात आहे.जिल्हा परिषदेच्या आवारातील मुख्य इमारत धोकादायक झाल्यामुळे गेल्या पावसाळ्यात रिकामी करण्यात आली. यातील कार्यालये जवळच्या दोन इमारतींसह आरोग्य विभागाच्या इमारतीमध्ये, बांधकाम विभागाच्या कॅम्पसमध्ये हलवण्यात आली. याशिवाय, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतींची दालने पदाधिकाºयांच्या निवासस्थानांमध्येच सध्या सुरू आहेत. आता वागळे इस्टेट परिसरातील जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांच्या निवासी इमारती पाडण्यास राज्य शासनाने अलीकडेच मंजुरी दिली. आता या इमारती पाडण्यासाठी खर्चास मंजुरी घेण्यासाठी हाचलाची सुरू आहेत.कार्यालयांसाठी भाड्याच्या जागेचा शोधइमारतींमधील कर्मचाºयांची निवासव्यवस्था अन्यत्र करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, नोटीस मिळालेली नसल्याचे काही कर्मचाºयांनी सांगितले. कार्यालयीन इमारत व निवासी इमारतीच्या दोन विंग पाडून तेथे कोट्यवधी रुपये खर्चाच्या नवीन इमारती बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या आवारातील सुस्थितीत असलेल्या पदाधिकारी निवास व प्रशासकीय इमारत यापाठोपाठ पाडण्याचे प्रयत्न आहेत. यापूर्वी या इमारती पाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. यानंतर अन्य इमारती पाडल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या कार्यालयांसाठी भाड्याच्या जागेचा शोध सुरू झाला आहे. चरई येथील एमटीएनएलच्या इमारतीमधील जागा भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द झाला आहे. यामुळे जिल्हा परिषदेला अन्यत्र भाड्याने जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहेत.