शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

वाड्यातील भातखरेदी केंद्रांना लागली शासकीय ‘उदासीनतेची घूस’

By admin | Updated: February 1, 2016 01:10 IST

तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला

वसंत भोईर,  वाडातालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यामार्फत भातखरेदी केंद्र वाडा तालुक्यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगाव, खैरे-आंबिवली या ठिकाणी सुरू करण्यात आली. परंतु या केंद्रावर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारूनही भातविक्री करता येत नाही. त्याच प्रमाणे या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरवितांना नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भात पिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे या केंद्राच्या भात साठवणुकीच्या गोडवूनची क्षमता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी भातविक्री पासून वंचित रहात आहेत.तालुक्यातील महसूली गावांची संख्या १५० हून अधिक असताना केवळ सात भातखरेदी केंद्र सुरू केल्याने या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागत असल्याने शिवाय अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने आधीच न परवडणाऱ्या शेतीत बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती शेतकऱ्याची आहे. अशा या उदासिन धोरणामुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमी भावापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील देवघर येथील प्रगतीशिल शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील भातखरेदी केंद्रांची संख्या कमी असून भातखरेदी करण्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारूनही पोती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर खानिवली भातखरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असताना ७०० क्विटंल भातखरेदी केल्याचे सांगून अधिकाधिक भाताची खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.