शहरं
Join us  
Trending Stories
1
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
2
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
3
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
4
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 
5
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
6
टायपिंगमधून सुटका! तुम्ही जो विचार कराल तो दिसेल स्क्रीनवर; मनातील विचारांनी मोबाइलही चालवता येणार
7
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
8
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
9
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
10
मोठी कारवाई! मराठवाड्यातील चार जिल्ह्यात ४ कोटी ४८ लाखांचा माल जप्त, ४६४ जणांना अटक
11
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
12
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
13
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
14
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
15
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
16
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
17
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
18
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
19
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
20
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा

वाड्यातील भातखरेदी केंद्रांना लागली शासकीय ‘उदासीनतेची घूस’

By admin | Updated: February 1, 2016 01:10 IST

तालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला

वसंत भोईर,  वाडातालुक्यात सुरू असलेल्या भातखरेदी केंद्रांना महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास मंडळाच्या उदासिन कारभाराची घूस लागल्याने भातखरेदीचा पुरता बोजवारा उडाला असून शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.महाराष्ट्राच्या सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यामार्फत भातखरेदी केंद्र वाडा तालुक्यात खानिवली, गोऱ्हे, परळी, पोशेरी, तिळगाव, खैरे-आंबिवली या ठिकाणी सुरू करण्यात आली. परंतु या केंद्रावर भात भरण्यासाठी लागणारे पोतीच उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अनेक दिवस हेलपाटे मारूनही भातविक्री करता येत नाही. त्याच प्रमाणे या केंद्रावरील कर्मचारी शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊन अपमानित करत असल्याच्या अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. केंद्रावर भात घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना भाताची प्रतवारी ठरवितांना नुकसान सोसावे लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. वाडा तालुका हा भौगोलिक दृष्ट्या मोठा असून या तालुक्यात भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. तालुक्याला भाताचे कोठार म्हणून संबोधले जाते. येथे भात पिकाचे क्षेत्रही अन्य तालुक्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात जास्तीत जास्त भातखरेदी केंद्र उघडणे अपेक्षित असताना मोजकीच केंद्र उघडल्याने शेतकऱ्यांची गर्दी या केंद्रावर वाढली आहे. त्यामुळे या केंद्राच्या भात साठवणुकीच्या गोडवूनची क्षमता मर्यादित असल्याने अनेक शेतकरी भातविक्री पासून वंचित रहात आहेत.तालुक्यातील महसूली गावांची संख्या १५० हून अधिक असताना केवळ सात भातखरेदी केंद्र सुरू केल्याने या केंद्रावर भात घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांना २० ते २५ किमी अंतराचा प्रवास करून जावे लागत असल्याने शिवाय अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने आधीच न परवडणाऱ्या शेतीत बुडत्याचा पाय खोलात अशी स्थिती शेतकऱ्याची आहे. अशा या उदासिन धोरणामुळे वाडा तालुक्यातील शेतकऱ्यांना हमी भावापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील देवघर येथील प्रगतीशिल शेतकरी प्रफुल्ल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता तालुक्यातील भातखरेदी केंद्रांची संख्या कमी असून भातखरेदी करण्याचे प्रमाण अल्प आहे. शिवाय शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारूनही पोती मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. तर खानिवली भातखरेदी केंद्राचे केंद्रप्रमुख भास्कर जाधव यांच्याशी संपर्क साधला असताना ७०० क्विटंल भातखरेदी केल्याचे सांगून अधिकाधिक भाताची खरेदी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.